शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे कामाचा खोळंबा

By admin | Updated: January 15, 2016 01:41 IST

भद्रावती येथील आठवडी बाजार बुधवारी असतो. त्यामुळे याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येत असतात.

आठ तास बैठक : गरजू नागरिकांची गैरसोयभद्रावती : भद्रावती येथील आठवडी बाजार बुधवारी असतो. त्यामुळे याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येत असतात. मात्र ऐन आठवडी बाजाराच्याच दिवशी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीमध्ये मासिक बैठकीचे आयोजन केले. ही बैठक तब्बल आठ तास चालल्याने अधिकाऱ्यांची वाट पाहता पाहता कार्यालय बंद झाले. गरजू नागरिकांना दिवसभर पंचायत समिती कार्यालयात ताटकळत रहावे लागले.पंचायत समिती येथील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक काल बुधवारला घेण्यात आली. त्याच दिवशी ग्रामीण भागातील कामगारांना आठवडी बाजार बुधवार असल्याने सुट्टी असते. त्याचा फायदा घेत तालुक्यातील घरकूल लाभार्थी, शौचालय लाभार्थी, बचतगट महिला, रोजगार हमी योजनेतील कामगार व इतर नागरिक कामासाठी आले. मात्र सकाळी १० वाजतापासून कार्यालयातील विविध विभागात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. सर्वच मासिक बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक एक ते दोन तास चालणार व आपले काम होणार, या आशेने गरजू नागरिक ताटकळत उभे होते. काही आल्या पावली परतले. मात्र बैठक लांबणीवर जात असल्याचे पाहून येथील सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे, प्रशांत काळे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चिठ्ठीद्वारे सूचना केल्या. मात्र या सूचनेकडे संवर्ग विकास अधिकारी मानकर यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे गरजू नागरिक तिथेच अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. मात्र सायंकाळचे ६ वाजेपर्यंत बैठक चालत राहिल्याने २५ ते ३० कि.मी. अंतरावरून कामासाठी आलेले नागरिक अक्षरश: वैतागून गेले. अखेर वेळ झाल्याने कार्यालयही बंद झाले. त्यामुळे पंचायत समितीमध्ये एकही काम होऊ शकले नाही. त्यातच आठवडी बाजारातही नागरिक जाऊ शकले नाही. त्यातच रात्रीची वेळ झाल्याने गावाकडे जाणाऱ्या एसटी बस नव्हत्या. परिणामी अनेकांना बसस्थानकामध्येच रात्र कुडकुडत काढावी लागली. पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी व सभापती यांच्या अरेरावी धोरणामुळे ग्रामीण भागातील सुनील तेलंग, माधव जीवतोडे, बंडू पिंपळकर, कवडू कुमरे, अजाब पाटील, महादेव बुरडकर, मनोहर श्रीरामे, शालिनी मडावी, आशाबाई सिडाम, ममता मडावी, पार्वता आत्राम, कल्पना कोडापे, आदीसह गरजू नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. (शहर प्रतिनिधी)