शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अनुकंपा उमेदवाराच्या रूजू आदेशाची मुख्याधापकाकडून अवहेलना

By admin | Updated: March 11, 2015 01:05 IST

अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे.

चंद्रपूर: अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी खुद्द शिक्षण खात्याचीच दिशाभूल केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.केळझर येथील आनंद विद्यालयात सुभाष महादेव कानमपल्लीवार यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा दावा होता. या नुसार शिक्षणाधिकारी कार्यालय आणि संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे पत्रव्यवहार केल्यावर तेथील मुख्याध्यापक अनिल मन्साराम कामडी यांनी २ सप्टेंबर २०१४ रोजी सुभाष कानमपल्लीवार यांना लिपिक पदावर रूजू करून घेतले होते. शाळा समितीच्या ठराव क्रांक दोन नुसार रूजू करून घेत असल्याचे पत्रही त्यांनी त्याच दिवशी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविले होते. या काळात लिपिक या नात्याने कानमपल्लीवार यांनी शाळेतील सर्व पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामकाज सांभाळले. मात्र सहा महिने होत आले तरीही मुख्याध्यापकांनी नियुक्ती आदेश काढला नव्हता. एवढेच नाही तर पदमान्यतेचा प्रस्तावही पाठविला नव्हता. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनही यासंदर्भात वारंवार स्मरणपत्र देऊनही मुख्याध्यापकांकडून टाळाटाळच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी १० मार्चला सकाळपाळीतील शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक कामडी यांनी अचानकपणे सेवा समाप्तीचा आदेशच लिपिक सुभाष कानमपल्लीवारच्या हातात दिला. या प्रकाराने भांबावलेल्या लिपिकाने मुख्याध्यापकांना विचारणा केली, मात्र काहीही न सांगता, उद्यापासून शाळेत यायचे नाही, असे सांगून बोळवण केल्याचे कानमपल्लीवार यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)