शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

अनुकंपा उमेदवाराच्या रूजू आदेशाची मुख्याधापकाकडून अवहेलना

By admin | Updated: March 11, 2015 01:05 IST

अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे.

चंद्रपूर: अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी खुद्द शिक्षण खात्याचीच दिशाभूल केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.केळझर येथील आनंद विद्यालयात सुभाष महादेव कानमपल्लीवार यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा दावा होता. या नुसार शिक्षणाधिकारी कार्यालय आणि संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे पत्रव्यवहार केल्यावर तेथील मुख्याध्यापक अनिल मन्साराम कामडी यांनी २ सप्टेंबर २०१४ रोजी सुभाष कानमपल्लीवार यांना लिपिक पदावर रूजू करून घेतले होते. शाळा समितीच्या ठराव क्रांक दोन नुसार रूजू करून घेत असल्याचे पत्रही त्यांनी त्याच दिवशी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविले होते. या काळात लिपिक या नात्याने कानमपल्लीवार यांनी शाळेतील सर्व पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामकाज सांभाळले. मात्र सहा महिने होत आले तरीही मुख्याध्यापकांनी नियुक्ती आदेश काढला नव्हता. एवढेच नाही तर पदमान्यतेचा प्रस्तावही पाठविला नव्हता. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनही यासंदर्भात वारंवार स्मरणपत्र देऊनही मुख्याध्यापकांकडून टाळाटाळच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी १० मार्चला सकाळपाळीतील शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक कामडी यांनी अचानकपणे सेवा समाप्तीचा आदेशच लिपिक सुभाष कानमपल्लीवारच्या हातात दिला. या प्रकाराने भांबावलेल्या लिपिकाने मुख्याध्यापकांना विचारणा केली, मात्र काहीही न सांगता, उद्यापासून शाळेत यायचे नाही, असे सांगून बोळवण केल्याचे कानमपल्लीवार यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)