शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
4
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
5
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
6
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
7
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
8
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
9
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
10
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
11
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
12
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
13
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
14
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
15
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
16
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
17
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
18
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
19
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समित्यांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. या समितीने उल्लेखनीय कामगिरी बजावत तंटे, वादविवाद यावर नियंत्रण मिळवून एकोपा, शांतता व सामोपचाराचे वातावरण राखण्यात यश प्राप्त केले होते. मात्र, सध्या या समित्यांची पिछेहाट सुरू झाली आहे.

तंटामुक्त गाव समित्यांची प्रभावी अंमलबजावणी संबंध राज्यभर झाली. महात्मा गांधींना अपेक्षित असलेले तंटामुक्त गाव निर्माण व्हावे, या उद्देशाने सदर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर, या समित्यांमार्फत गावस्तरावरील वाद, किरकोळ भांडणे गावातच मिटविण्याचे प्रयत्न गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत यशस्वीरीत्या झाले. किरकोळ प्रकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन बरीच प्रकरणे वाढविण्याऐवजी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमाने त्यांच्यात समन्वयाची व सामंजस्याची भूमिका घेऊन वादाचा निपटारा करीत होती. याचा लेखाजोखाही काही काळ तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षाकडे लेखी स्वरूपात होता. त्याची पूर्तता करून, तो पोलीस प्रशासनाकडे सुपुर्द करायचा होता.

मात्र, चिमूर तालुक्यातील तंटामुक्त ग्राम समिती गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच उरली आहे. आता गावात कोण तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष आहे, याचाही थांगपत्ता नाही.

बॉक्स

बैठकीला बोलावतात पोलीस पाटलांना

गावातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी पोलीस पाटलांना बैठकीला बोलावले जाते. त्या प्रमाणात तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षांना महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे गाव खेड्यातले तंटे कमी होण्याऐवजी किंवा गाव तंटामुक्त होण्याऐवजी गाव तंटायुक्त होत चालले आहे.

बॉक्स

नव्या स्वरूपात समित्या स्थापन करण्याची गरज

गाव जर खरंच तंटामुक्त व्हावे, अशी शासन प्रशासन व राज्यकर्त्यांची भूमिका असेल, तर पुन्हा गावागावांत तंटामुक्त ग्राम समितीचे नवे स्वरूप निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांचा मेळ घालून प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वसमावेशक लोकांचा सहभाग घेऊन, तंटामुक्त गाव समितीला ग्रहणातून मुक्त करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

कोट

तंटामुक्त गाव समित्या पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागल्यास गाव तंटामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पुन्हा प्रशासनाने कंबर कसण्याची गरज निर्माण झाली आहे.

- प्रशांत कोल्हे, सरपंच ग्रामपंचायत, वाहानगाव.