शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

तंटामुक्त गाव समित्यांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. या समितीने उल्लेखनीय कामगिरी बजावत तंटे, वादविवाद यावर नियंत्रण मिळवून एकोपा, शांतता व सामोपचाराचे वातावरण राखण्यात यश प्राप्त केले होते. मात्र, सध्या या समित्यांची पिछेहाट सुरू झाली आहे.

तंटामुक्त गाव समित्यांची प्रभावी अंमलबजावणी संबंध राज्यभर झाली. महात्मा गांधींना अपेक्षित असलेले तंटामुक्त गाव निर्माण व्हावे, या उद्देशाने सदर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर, या समित्यांमार्फत गावस्तरावरील वाद, किरकोळ भांडणे गावातच मिटविण्याचे प्रयत्न गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत यशस्वीरीत्या झाले. किरकोळ प्रकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन बरीच प्रकरणे वाढविण्याऐवजी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमाने त्यांच्यात समन्वयाची व सामंजस्याची भूमिका घेऊन वादाचा निपटारा करीत होती. याचा लेखाजोखाही काही काळ तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षाकडे लेखी स्वरूपात होता. त्याची पूर्तता करून, तो पोलीस प्रशासनाकडे सुपुर्द करायचा होता.

मात्र, चिमूर तालुक्यातील तंटामुक्त ग्राम समिती गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच उरली आहे. आता गावात कोण तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष आहे, याचाही थांगपत्ता नाही.

बॉक्स

बैठकीला बोलावतात पोलीस पाटलांना

गावातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी पोलीस पाटलांना बैठकीला बोलावले जाते. त्या प्रमाणात तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षांना महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे गाव खेड्यातले तंटे कमी होण्याऐवजी किंवा गाव तंटामुक्त होण्याऐवजी गाव तंटायुक्त होत चालले आहे.

बॉक्स

नव्या स्वरूपात समित्या स्थापन करण्याची गरज

गाव जर खरंच तंटामुक्त व्हावे, अशी शासन प्रशासन व राज्यकर्त्यांची भूमिका असेल, तर पुन्हा गावागावांत तंटामुक्त ग्राम समितीचे नवे स्वरूप निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांचा मेळ घालून प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वसमावेशक लोकांचा सहभाग घेऊन, तंटामुक्त गाव समितीला ग्रहणातून मुक्त करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

कोट

तंटामुक्त गाव समित्या पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागल्यास गाव तंटामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पुन्हा प्रशासनाने कंबर कसण्याची गरज निर्माण झाली आहे.

- प्रशांत कोल्हे, सरपंच ग्रामपंचायत, वाहानगाव.