शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

वीज वसाहतीच्या सदनिकांची दुरवस्था

By admin | Updated: March 13, 2015 01:02 IST

बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र १९८४ पर्यंत कार्यान्वित होते. तद्नंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थलांतर ऊर्जानगर औष्णिक वीज केंद्रात करण्यात आले.

बल्लारपूर: बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र १९८४ पर्यंत कार्यान्वित होते. तद्नंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थलांतर ऊर्जानगर औष्णिक वीज केंद्रात करण्यात आले. तेव्हापासून १०५ हेक्टरचा परिसर ओसाड झाला आहे. आजघडीला वीज केंद्राच्या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वीज वसाहतीच्या सदानिकांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर वीज केंद्र सर्वप्रथम सुरु करण्यात आले होते. उच्च दर्जाचा कोळसा व वर्धा नदीचे मुबलक पाणी यामुळे एकेकाळी या वीज केंद्राला भरभराटी आली होती. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी ३०० पेक्षा अधिक सदानिकांचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी उच्च प्रतीच्या साहित्याचा त्यावेळी वापर करण्यात आला. आजघडीला मात्र यातील केवळ २५ च्या आसपास सदनिकाच सुस्थितीत असल्याचे दिसून येते. येथील सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे राजरोसपणे सदनिकांची दारे व खिडक्या चोरट्यांनी लंपास करण्याचा धडाका सुरु केला आहे.बल्लारपूर वीज केंद्राचा परिसर तब्बल १०५ हेक्टर परिसरात विस्तारलेला असून सध्या तो ओसाड पडला आहे. १० वर्षांपूर्वी परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी सभोवताल तारेचे कुंपण लावण्यात आले होते. मात्र चोरट्यांच्या तावडीत सापडलेले कुंपण आजघडीला बेपत्ता झाले आहे. सध्यस्थितीत वीज केंद्राचा परिसर चोरांचे आश्रयस्थान बनल्याचे वास्तव आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी या परिसरातून झाली आहे. परिसराच्या सुरक्षतेसाठी नाममात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक त्याला कारणीभूत आहे. आजघडीला एवढ्या मोठ्या परिसरात केवळ २० ते २५ कुटुंबिय वास्तव्याला असून केवळ एक ते दीड एकर परिसरात २२० केव्हीचे उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. उर्वरित परिसरात कंपनीची दोन-तीन कार्यालये सुरू असून यातून कार्यालयीन सोपस्कार पार पाडला जात आहे. मध्यंतरी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासंदर्भात सुतोवाच केले. त्यानंतर बॉटनिकल गार्डन निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ओसाड परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी शासकीय पातळीवरचे प्रयत्न अद्यापही सार्थकी लागल्याचे दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)विसापूरच्या व्यापारीपेठेला अवकळाबल्लारपूर वीज केंद्रामुळे हजारोंवर कर्मचारी विसापुरात त्यावेळी वास्तव्याला होते. विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीज केंद्र असल्याने येथील व्यापारीपेठ जोमात होती. मात्र वीज केंद्र कायमचे बंद पडल्याने येथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. जवळच्या कागद उद्योगात कंत्राटदारी पद्धती आली. काही वर्षातच प्लायवूड कंपनीला टाळे लागले. परिणामी येथील व्यापारीपेठेला अवकळा आली आहे. वीज केंद्र व प्लायवूड कंपनी बंद झाल्याचा परिणाम कामगारांवर व व्यापाऱ्यांवर झाला आहे. दोन्ही उद्योग राजकीय ईच्छाशक्तीचे बळी ठरले आहेत.