शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

चार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:57 IST

जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गुरूवारपासून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस.मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदींची उपस्थिती होती. यावेळी इतर आरोग्य विषयक योजनांचाही आढावा घेण्यात आला.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १९ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असुन त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासुन धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. कृमीदोषांचा संसर्ग दुषित वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे तसेच बालकांची बौध्दिक व शारीरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. भारतात ५ वर्षांखालील मुला - मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळून आले आहे. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी एन. एफ. एच. एस ४ च्या सर्व्हेनुसार ३४.४ टक्के आहे. तसेच एन.एफ.एच.एस ३ च्या सर्व्हेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९ टक्के आढळले आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबविण्यात येत आहे.१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा मुख्य उद्देश आहे. सदर मोहिम सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका क्षेत्र वगळूण व सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कुल, सी. बी. एस. सी. स्कुल, नवोदय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकूल संस्कार केंद्रे, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षांचे विद्यार्थी, नर्सिग कॉलेज, आय.टी.आय., पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला वाणिज्य व विज्ञान, फार्मसी, महाविद्यालय, डी.एड् महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. या मोहीमेला नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.