शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल तिथे फलक लावले जात आहे. या फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र यासाठी महापालिका प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.

शहरात फलक लावण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन काही शुल्क अदा करावे लागते. मात्र काही मोजक्याच जाहिरातदारांनी फलक लावण्याची परवानगी घेतली आहे. फुकटे जाहिरातदार महापालिका प्रशासन तसेच सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. शहरातील वीज खांब, चौकातील सिग्नल एवढेच नाही तर वृक्षांनाही या फलकबाजांनी सोडले नाही. नागरिकांचे लक्ष जाईल, अशी जागा शोधून फलक लावल्या जात आहे. यामुळे लक्ष विचलित होऊन वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहराचे सौंदर्यही यामुळे विद्रूप झाले आहे. मात्र महापालिका प्रशासनातील संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्यावेळी जाग आली तरच महापालिका प्रशासन अवैध फलक काढण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.

बाॅक्स

प्रशासनाचे दुर्लक्ष

शहर विद्रपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश आहे. मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. एवढेच नाही तर महापालिकेतील काही पदाधिकारी तसेच नगरसेवकही शहरातील विविध भागात विविध फलक लावून शहर विद्रुपीकरणासाठी हातभार लावत आहे.

वाहतूक सिग्नल, वीज खांबालाही फलक लावल्या जात आहे. रस्त्याच्या कडेला असल्या झाडांवरही फलक असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, हमाविद्यालय फलक लावण्यात अग्रेसर असून काही व्यावसायिक वाट्टेत तिथे फलक लावून मोकळे होत आहे. कारवाई होत नसल्याने स‌र्वांचेच फावत आहे.

--

होर्डिंगमधून पालिकेची कमाई

महापालिकेने शहरातील विविध जागा होर्डिंगसाठी निश्चित केल्या आहेत. यातून मनपाला मोठ्या प्रमाणत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, काही खासगी व्यक्तींनी फलकाची परवानगी घेतली असून ते महापालिकेकडे यासंदर्भातल करसुद्धा भरतात. महापालिकेने निश्चित केलेल्या काही फलकांद्वारे जनजागृतीसंदर्भात माहिती दिली जात असून अनेकवेळा ते खासगी व्यक्तींनाही दिल्या जात असून याद्वारे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

बाॅक्स

शहरातील जनता काॅलेज, बापट नगर, गांधी चौक, वरोरा नाका चौका, जटपुरा गेट परिसर, बाबूपेठ, बंगाली कॅम्प चौक या व्यतिरिक्त विविध रस्त्यांच्या कडेला तसेच वीज खांब, सिग्नलवरही मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता आहे.

कोट

शहर विद्रुपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे महापालिकेला कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अवैध ठिकाणी लावलेले जाहिरात फलक काढण्याची हिंमत महापालिका दाखवित नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.

-संजय वैद्य

माजी नगरसेवक, चंद्रपूर