शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

उघड्यावरील पदार्थांसोबत आजार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:01 IST

शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन : अन्न व औषध प्रशासन विभाग निश्चिंतच

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असतानाही अन्न व औषध विभाग मात्र निश्चिंत दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. म्हणून राज्यशासनाने प्लास्टिक बंदी केली. मात्र उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होते. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीवर विभागाचे निर्बंध नसल्यामुळे नागरिकांना या नाश्त्यासोबत आजार मोफत मिळत असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी हॉटेल्स, तर अनेकांनी हातठेल्यावर खाण्याचे पदार्थ विकण्याचा धंदा सुरु केला. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेणे गरजचे आहे. याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अन्नपदार्थावर माशा बसतात. हे पदार्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. अनेकजण रोगांना बळी पडतात. एकीकडे मनपा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करीत आहे हे विशेष.व्यावसायिकांकडून नियमांना तिलाजंलीहॉटेल्स व्यावसायिक, हातठेले आदीसाठी अन्न औषध विभागांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार विशेष नियम तयार केले आहेत. मात्र व्यावसायिकांकडून व हातठेलेवाल्यांकडून संपूर्ण नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कारवाई नाहीअन्न औषध विभागाकडून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते. मात्र चंद्रपूर शहरात सदर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.