शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील पदार्थांसोबत आजार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:01 IST

शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन : अन्न व औषध प्रशासन विभाग निश्चिंतच

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असतानाही अन्न व औषध विभाग मात्र निश्चिंत दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. म्हणून राज्यशासनाने प्लास्टिक बंदी केली. मात्र उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होते. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीवर विभागाचे निर्बंध नसल्यामुळे नागरिकांना या नाश्त्यासोबत आजार मोफत मिळत असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी हॉटेल्स, तर अनेकांनी हातठेल्यावर खाण्याचे पदार्थ विकण्याचा धंदा सुरु केला. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेणे गरजचे आहे. याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अन्नपदार्थावर माशा बसतात. हे पदार्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. अनेकजण रोगांना बळी पडतात. एकीकडे मनपा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करीत आहे हे विशेष.व्यावसायिकांकडून नियमांना तिलाजंलीहॉटेल्स व्यावसायिक, हातठेले आदीसाठी अन्न औषध विभागांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार विशेष नियम तयार केले आहेत. मात्र व्यावसायिकांकडून व हातठेलेवाल्यांकडून संपूर्ण नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कारवाई नाहीअन्न औषध विभागाकडून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते. मात्र चंद्रपूर शहरात सदर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.