शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

उघड्यावरील पदार्थांसोबत आजार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:01 IST

शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन : अन्न व औषध प्रशासन विभाग निश्चिंतच

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असतानाही अन्न व औषध विभाग मात्र निश्चिंत दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. म्हणून राज्यशासनाने प्लास्टिक बंदी केली. मात्र उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होते. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीवर विभागाचे निर्बंध नसल्यामुळे नागरिकांना या नाश्त्यासोबत आजार मोफत मिळत असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी हॉटेल्स, तर अनेकांनी हातठेल्यावर खाण्याचे पदार्थ विकण्याचा धंदा सुरु केला. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेणे गरजचे आहे. याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अन्नपदार्थावर माशा बसतात. हे पदार्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. अनेकजण रोगांना बळी पडतात. एकीकडे मनपा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करीत आहे हे विशेष.व्यावसायिकांकडून नियमांना तिलाजंलीहॉटेल्स व्यावसायिक, हातठेले आदीसाठी अन्न औषध विभागांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार विशेष नियम तयार केले आहेत. मात्र व्यावसायिकांकडून व हातठेलेवाल्यांकडून संपूर्ण नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कारवाई नाहीअन्न औषध विभागाकडून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते. मात्र चंद्रपूर शहरात सदर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.