शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

इटियाडोह धरणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Updated: November 26, 2015 00:53 IST

गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना ...

रामदास आठवले : शिष्टमंडळाला आश्वासनचंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना इडियाडोह धरणाचे पाणी पुणविण्यात यावे या मागणीसाठी शिष्टमंडळाने आरपीआय (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या निवासस्थानी भेटून देऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाची निर्मिती सन १९६५ साली करण्यात आली. १९७३ पासून धरणाचे पाणी शेतीसाठी सुरू करण्यात आले. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौ.मी. असून क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर एवढी आहे. सदर धरणाचे पाणी अर्जूनी मोर पासून ते गडचिरोली जिल्ह्यात ८० ते ९० किमीचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु धरणापासून जवळच असलेल्या अर्जूनी/मोर तालुक्यातील बोंडगाव देवी परिसरातील १५ ते २० खेडेगावांना धरणाच्या पाण्यापासून मागील ३० वर्षांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.खा. रामदास आठवले यांना शिष्टमंडळाने निवेदन मागणी केली यावेळी व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके, उपसरपंच माधोराव झोळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजू ठवरे, सुभाष रामटेके, संजय बुटले, कमलेश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. गावाच्या पाणी प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करु असे रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)