शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

अधिकाऱ्यांशी चर्चा, टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात राजनांदगाव- वरोरा ट्रान्सफार्म कंपनीने अनेकांच्या शेतात टॉवर उभे करणे सुरू केले होते. शेतकऱ्यांना अनियमित मोबदला देवून अन्याय केला होता. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी व आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला दोन महिने तेरा दिवस लोटल्यानंतर उपोषण मंडपाला शासकीय अधिकाऱ्यांनी ...

ठळक मुद्देन्याय मिळणार : दोन महिने १३ दिवसानंतर आंदोलनाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात राजनांदगाव- वरोरा ट्रान्सफार्म कंपनीने अनेकांच्या शेतात टॉवर उभे करणे सुरू केले होते. शेतकऱ्यांना अनियमित मोबदला देवून अन्याय केला होता. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी व आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला दोन महिने तेरा दिवस लोटल्यानंतर उपोषण मंडपाला शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली व शेतकºयांशी चर्चा केली. त्यामुळे बुधवारी दीड वाजता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे उपोषण सुटले.टॉवर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीची मोजणी होईपर्यत टॉवरचे काम बंद करण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम पूर्ण झाले अशा शेतकºयांना मोबदला द्यावा, प्रत्येक शेतकºयांना २५ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शासन परिपत्रक ३१ मे २०१७ च्या परिपत्रकातील नियमांचा भंग केल्याने कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, मोजणीचे पैसे भरूनही मोजणी न केल्यामुळे महसूल बुडविणाºया कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, उभ्या पिकाचे नुकसान करणाºया कंपनीवर गुन्हे दाखल करावे, आदी मागण्यांसाठी शेतकºयांनी उपोषणाला सुरूवात केली होते.या सर्व मागण्यांवर उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार संजय नागटिळक यांनी शेतकºयांशी चर्चा केली व रेडीरेकनरच्या दराने कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार याची माहिती दिली. त्यामुळे शेतकºयांनी उपोषण सोडले. यावेळी टॉवरग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन सोनटक्के उपोषणकर्ते अन्ना डोये, आनंदराव केमये, वसंत चंदेलकर, रामभाऊ कोलते, अमृत ननावरे, संदीप नागोसे, अमोल देठे, शामराव गायकी, प्रभु गेडाम, तातोबा चट्टे, गोठे आदी उपस्थित होते.टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे विलास डांगे यांनी उपोषणग्रस्त शेतकऱ्यांना व प्रशासनाला चुकीची माहिती देवून उपोषण लांबविले. त्यामुळे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला व प्रशासनात शेतकऱ्यांविषयी गैरसमज निर्माण झाला होता. मात्र चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला.- हरिष धार्मिकउपविभागीय अधिकारी, चिमूर.