शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

बांबूला वाहतूक परवान्यातून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:30 IST

बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बुरुड समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. सन २०१७ च्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबु प्रवण क्षेत्रात ४४६५ चौ.कि.मी. इतकी भरीव वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. बांबु क्षेत्राचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र महाराष्ट्र बांबु विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बांबुच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला आपण प्राधान्य दिले असून बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट आपण स्थापन केले आहेत. बांबुला वाहतूक परवान्यातून सूट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हा निर्णय आता देश पातळीवरसुध्दा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, वनेमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपुरात विदर्भ बुरूड समाज संघटनेद्वारे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बांबु धोरणाअंतर्गत बुरूड समाज बांधवांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण लवकरच एक बैठक घेवून योग्य दिशा निश्चित करू. बुरूड समाज नेहमीच सात्विक आणि प्रामाणिक राहिला आहे. बांबुच्या माध्यमातून उपजिविका करणाऱ्या या समाजाने नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. नविन बुरुडांना वन विभागाकडे नोंदणी करण्यास मान्यता देत बुरुड समाजातील बांबू कारागीरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या बांबुवरील स्वामित्वशुल्कात सूट प्रदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बांबुपासून रोजगार निर्मितीच्या शासनाच्या धोरणाला अनुसरून बुरूड समाज बांधवांना योग्य प्रशिक्षण देण्यास शासन तयार आहे. त्या दृष्टीने समाज बांधवांनी आपली मानसिकता तयार करण्याची आवश्यकता आहे. बुरूड समाज बांधवांनी या दृष्टीने त्यांच्या संकल्पना सादर कराव्या, शासन पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.यावेळी आ. नाना श्यामकुळे म्हणाले, राज्य शासनाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बांबु क्षेत्रासाठी अभुतपूर्व असे निर्णय घेतले आहे. सामाजिक जाणीव लाभलेला असा नेता पाठिशी असताना बुरूड समाज बांधवांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे सांगितले. यावेळी बुरूड समाजाचे नेते किशोर जोरगेवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आ. प्रा. अनिल सोले, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार, व्यंकट रामलू, कैलाश पदमगिरीवार, स्वाती वडपल्लीवार, अनुराधा पल्लडवार, बंडू गैनेवार, दिपांजली मंथनवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.