शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

शासनाविरोधात असंतोष रस्त्यावर

By admin | Updated: April 24, 2015 01:02 IST

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे.

चंद्रपूर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे. त्याच्या निषेधार्थ शहरी प्रकल्पातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपला रोष व्यक्त केला.अंगणवाडी सेविकांना बऱ्याच संघर्षानंतर काँग्रेस शासनाने मानधनात वाढ केली. मात्र नवीन आलेल्या भाजपा सरकार ही मानधनवाढ रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध करण्याकरिता अंगणवाडी सेविकांना हा मोर्चा काढला. भाजपा शासनाचा धिक्कार असो, १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ मिळालीच पाहिजे, दिवाळी भेट मिळलीच पाहिजे, भूमीअधिग्रहण कायद्याचा धिक्कार असो, सर्वांना ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, साठ वर्षावरील वृद्धांना पेंशन मिळालीच पाहिजे, फसव्या घोषणा देणे बंद करा आदी घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे सभा घेण्यात आली. यावेळी संध्या खनके म्हणाल्या, १ एप्रिल २०१४ पासून मिळालेली मानधन वाढ ही काही तत्कालीन सरकारची मेहरबानी नाही. रस्त्यावर येऊन लढा देऊन ती आम्ही मिळविली आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली निवडून आलेले भाजपा सरकार म्हणते ही वाढ आम्हाला मान्य नाही. ९५० आणि मदतनीसला ५०० रुपयांची वाढ १ एप्रिल २०१५ पासून देतो, या निर्णयाचा आम्हाला विरोध असून तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा. शारदा लेनगुरे यांनीदेखील शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. प्रा. दहीवडे म्हणाले, अच्छे दिनचा फुगा आता पुर्णत: फुटला आहे. अंगणवाडी सेविकाच नव्हे तर कामगार, शेतकरी, शेतमजूर सारेच रस्त्यावर उतरले असून केवळ या देशाच्या बड्या भांडवलदारांना भाजपाला आणि त्यांच्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत आहे. त्यांची निती आणि त्यांचे धोरण असेच राहिले तर या देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा दहीवडे यांनी दिला. आशा नाखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेले व मागण्याचे निवेदन सादर केले. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पवित्रा ताकसांडे, राधा सुंकरवार, वंदना मुळे, रेखा रामटेके, वैशाली बोकारे, माया कासट्टीवार आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)