शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

शिस्तभंग कारभारावर लागणार अंकुश

By admin | Updated: April 2, 2015 01:24 IST

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत सुरू असलेल्या शिस्तभंग कारभारावर अंकूश घालण्यासाठी विभागीय सहनिबंधक (प्रशासक) ..

चंद्रपूर : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत सुरू असलेल्या शिस्तभंग कारभारावर अंकूश घालण्यासाठी विभागीय सहनिबंधक (प्रशासक) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याचा निर्णय पणन संचालनालयाने घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून बाजार समित्यांचे लेखा परिक्षण होणार असून यासाठी मार्गदर्शक तत्वे व नियमावली पणन संचालनालयाने जारी केली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांची ढेपाळलेली आर्थिक शिस्त अधिक पारदर्शक करण्यासाठी पणन संचालनालयाने हे ठोस पाऊल उचलले आहे. अनेक बाजार समित्या लेखा परिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तर लेखा परीक्षणावरील दोष दुरूस्ती अहवाल सादर करीत नाहीत. यामुळे बाजार समित्यांच्या आर्थिक कारभारावर अंकुश ठेवणे कठीण झाले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या लेखा परीक्षणासाठी विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना होणार आहे. पणन संचालकांनी नुकताच आढावा घेतला. यामध्ये चंद्रपूरसह राज्यभरातील ३०५ बाजार समित्यांपैकी ७८ बाजार समित्यांचे लेखापरीक्षण झाले नसल्याची बाब समोर आली. तर अनेक बाजार समित्यांनी लेखापरीक्षण अहवाल पणन संचालनालयाला सादर केलेला नाहीत. तसेच अनेक बाजार समित्यांनी लेखापरीक्षण अहवालात निघालेल्या दोषांची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे पणन संचालकांनी लेखा परीक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळून आल्यास त्याचा सविस्तर विशेष अहवाल प्रशासकीय कारवाईसाठी विशेष लेखापरीक्षकांच्या मार्फत पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक यांना सादर करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अशी आहे नियमावली जिल्हा उपनिबंधकांनी नोंदणीकृत बाजार समित्यांची यादी लेखा परीक्षकांच्या यादीसह ५ एप्रिलपर्र्यंत पाठविणे बंधनकारक आहे. विभागीय सहनिबंधकांच्या (प्रशासन) समितीने यादी अंतिम करून मंजुरीसाठी पणन संचालकांकडे पाठविणे. पणन संचालक यादीला मंजुरी देऊन संबंधित जिल्हा उपनिबंधक आणि विशेष लेखापरीक्षकांना आदेश देतील, एकाच बाजार समितीचे सलग ३ वेळा लेखापरीक्षण केलेल्या लेखापरीक्षकाला पुन्हा त्याच बाजार समितीचे लेखापरीक्षण करता येणार नाही. थकीत कालावधीपासून अद्ययावत काळापर्र्यंत लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षकाने लेखापरिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ दिवसाच्या आत पाच प्रतिमध्ये पणन संचालक जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांना सादर करणे आवश्यक आहे.बाजार समित्यांना लेखा परीक्षणावरील दोष दुरूस्ती अहवाल तीन महिन्याच्या आत शासकीय लेखापरीक्षकांनी सादर करावा. संबंधीत लेखापरीक्षकांनी दोष दुरूस्तीवर आपले अभिप्राय नोंदवून तो अहवाल विशेष लेखापरीक्षकांमार्फत पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांना सादर करावा. दोष दुरूस्ती अहवालातील असमाधानकारक दोष दुरूस्तीचे मुद्दे एक महिन्यात संबंधीत बाजार समितीला कळविण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांना पूर्ण करावी लागणार आहे. त्याची एक प्रत पणन संचालकांना सादर करावी लागणार आहे.