शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवासाच्या सवलतीपासून सिकलसेल रुग्ण वंचित

By admin | Updated: June 8, 2015 01:57 IST

सिकलसेलग्रस्त रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराकरिता त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय,

शासननिर्णय तीन महिन्यापूर्वी : परिवहन मंडळाला पत्रच नाहीभद्रावती : सिकलसेलग्रस्त रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराकरिता त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये प्रवास करण्यासाठी एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत १० मार्च २०१५ ला शासनाने निर्णय घेतला. शासन निर्णय होऊन तीन महिने झाले. परंतु अजूनही मोफत एस.टी. प्रवासाची सवलत सिकलसेलग्रस्त रुग्णांना लागू झालेली नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण पसरली आहे.महाराष्ट्रात जवळपास दोन लाख ५० हजार सिकलसेलग्रस्त रुग्ण आहे. त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण एकट्या विदर्भात आहेत. सिकलसेलग्रस्तांना नियमितपणे रक्त तपासण्यासाठी जावे लागते. आर्थिक परिस्थिती खराब असलेल्याने रुग्ण नियमितपणे रक्त तपासण्यास जावू शकत नाही. मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत शासनाचा जी.आर. निघाला. परंतु प्रत्यक्षात सवलत सुरू झाली नाही. चंद्रपूर येथील परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात याबाबत विचारणा केली असता शासनाचे यासंबंधित पत्र आमच्याकडे आलेच नाही. पत्र आल्यावर याबाबत कळवू, असे संबंधित अधिकाऱ्यांत सांगितल्याचे भद्रावती येथील सिकलग्रस्तरुग्ण वैद्य यांनी सांगितले.नुकत्याच नागपूर येथे झालेल्या समाधान शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाच मागण्यांचे निवेदन दिल्याचे सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी सांगितले. मोफत एस.टी. बाबतचा जी.आर. १० मार्च २०१५ चा आहे. याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. यासाठी १५.११ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. परंतु आजतागायत ही सवलत सुरू झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत विचारणा करावी, अशी मागणीही रामटेके यांनी केली आहे.तसेच १८ वर्षाच्या खालील मुलांना याबाबत जास्त त्रास होता. बाल हक्क सुरक्षा आयोगाकडून अशा मुलांची काळजी घेतल्या गेली पाहिजे. महाराष्ट्र राज्य सिकलसेल नियंत्रण व उपचार कायदा बनविण्यात यावा, असा कायदा अमेरिकेत आहे. राज्यात राज्यस्तरीय समन्वय समिती नेमल्या गेली पाहिजे. इत्यादी मागण्यांचे निवेदन रामटेके यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सिकलसेलग्रस्तांच्या समस्यांना चंद्रपूर जिल्ह्यानेच वाचा फोडली. ना. अहीर व ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने राज्याच्या १४ व केंद्राच्या ५ मागण्या सिकलकग्रस्त रुग्णांसाठी मान्य झाल्या, असे रामटेके यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)