शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त केल्यास नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:04 IST

देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.

ठळक मुद्देप्राध्यापकांची शैक्षणिक धोरणांविषयी नाराजी : एफ. ई. गर्ल्स कॉलेजमध्ये सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.अध्यक्षस्थानीचे नुटाचे माजी सचिव अनिल ढगे तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक नुटा व एम. फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. नितिन कोंगरे, सहसचिव डॉ. अजित चाजक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, उपस्थित होते. महाराष्टÑ प्राध्यापक महासंघाने प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, उच्च शिक्षणात शिक्षकांची भरती करावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची पिळवणूक थांबवावी. विद्यापीठ अनुदानसारख्या घटनात्मक संस्था बरखास्त करू नये, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. योगेश दूधपचारे, प्रा. नीलेश ढेकरे, डॉ. हितेंद्र धोटे, डॉ. शुभाष गिरडे, डॉ. कोसे, प्रा. कोरडे, किरणकुमार मनुरे, प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, संचालन डॉ. मीनाक्षी जुमडे यांनी केले. आभार डॉ. देशमुख यांनी मानले.उच्च शिक्षण क्षेत्रात १८ हजार ३०० पदे रिक्तप्रा. अजित जाचक म्हणाले, उच्च विभागात १८ हजार ३०० रिक्त पदे आहेत. याचा शिक्षित वर्गावर दूरगामी परिणाम होत आहे. महाराष्ट्र प्राध्यापक संघटना व नुटा समान कामास समान वेतन याप्रमाणे कंत्राटी प्राध्यापकांना वेतन मिळावे म्हणून लढा देत आहे. डॉ. नितीन कोंगरे यांनी शिक्षण क्षेत्राबाबत सरकार गंभीर नाही. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू न झाल्याने अन्याय होत आहे. विविध विद्यापीठाअंतर्गत नामनिर्देशित केलेल्या शिक्षकांमुळे सोयीची वर्णी लागत असून शिक्षण क्षेत्रात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. यातून शिक्षण क्षेत्र गढूळ होत असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. नामनिर्देशनाची त्रस्त पद्धत लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली.