शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त केल्यास नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:04 IST

देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.

ठळक मुद्देप्राध्यापकांची शैक्षणिक धोरणांविषयी नाराजी : एफ. ई. गर्ल्स कॉलेजमध्ये सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.अध्यक्षस्थानीचे नुटाचे माजी सचिव अनिल ढगे तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक नुटा व एम. फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. नितिन कोंगरे, सहसचिव डॉ. अजित चाजक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, उपस्थित होते. महाराष्टÑ प्राध्यापक महासंघाने प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, उच्च शिक्षणात शिक्षकांची भरती करावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची पिळवणूक थांबवावी. विद्यापीठ अनुदानसारख्या घटनात्मक संस्था बरखास्त करू नये, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. योगेश दूधपचारे, प्रा. नीलेश ढेकरे, डॉ. हितेंद्र धोटे, डॉ. शुभाष गिरडे, डॉ. कोसे, प्रा. कोरडे, किरणकुमार मनुरे, प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, संचालन डॉ. मीनाक्षी जुमडे यांनी केले. आभार डॉ. देशमुख यांनी मानले.उच्च शिक्षण क्षेत्रात १८ हजार ३०० पदे रिक्तप्रा. अजित जाचक म्हणाले, उच्च विभागात १८ हजार ३०० रिक्त पदे आहेत. याचा शिक्षित वर्गावर दूरगामी परिणाम होत आहे. महाराष्ट्र प्राध्यापक संघटना व नुटा समान कामास समान वेतन याप्रमाणे कंत्राटी प्राध्यापकांना वेतन मिळावे म्हणून लढा देत आहे. डॉ. नितीन कोंगरे यांनी शिक्षण क्षेत्राबाबत सरकार गंभीर नाही. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू न झाल्याने अन्याय होत आहे. विविध विद्यापीठाअंतर्गत नामनिर्देशित केलेल्या शिक्षकांमुळे सोयीची वर्णी लागत असून शिक्षण क्षेत्रात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. यातून शिक्षण क्षेत्र गढूळ होत असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. नामनिर्देशनाची त्रस्त पद्धत लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली.