शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

६० वर्षांवरील नागरिक सवलतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी, एसटीने ६५ वर्षांची अट रद्द करण्याची प्रवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने ६० वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र, एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्के सवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट पुढे केली जाते.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सत्यतेबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि छायाचित्रातील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे वाहकाकडून सांगितले जाते. शिवाय, बसस्थानकात विनाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही हीच अट लावल्या जाते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.संभ्रम तात्काळ दूर करावासर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरुन ६० वर्षे करण्यात आली, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती. ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले. परंतु, एसटी विभागात हा संभ्रम अद्याप कायम आहे.योजना कागदावरचज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या. संबंधित अधिकारी योजनांची अंमलबजावणी करीत नाही. ग्रामीण भागात एसटी महत्त्वाचा आधार मानली जाते. पण, प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळत नाही. नियम कागदावरच राहतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.