शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांवरील नागरिक सवलतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी, एसटीने ६५ वर्षांची अट रद्द करण्याची प्रवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने ६० वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र, एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्के सवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट पुढे केली जाते.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सत्यतेबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि छायाचित्रातील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे वाहकाकडून सांगितले जाते. शिवाय, बसस्थानकात विनाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही हीच अट लावल्या जाते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.संभ्रम तात्काळ दूर करावासर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरुन ६० वर्षे करण्यात आली, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती. ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले. परंतु, एसटी विभागात हा संभ्रम अद्याप कायम आहे.योजना कागदावरचज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या. संबंधित अधिकारी योजनांची अंमलबजावणी करीत नाही. ग्रामीण भागात एसटी महत्त्वाचा आधार मानली जाते. पण, प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळत नाही. नियम कागदावरच राहतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.