शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

६० वर्षांवरील नागरिक सवलतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी, एसटीने ६५ वर्षांची अट रद्द करण्याची प्रवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने ६० वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र, एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्के सवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट पुढे केली जाते.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सत्यतेबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि छायाचित्रातील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे वाहकाकडून सांगितले जाते. शिवाय, बसस्थानकात विनाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही हीच अट लावल्या जाते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.संभ्रम तात्काळ दूर करावासर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरुन ६० वर्षे करण्यात आली, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती. ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले. परंतु, एसटी विभागात हा संभ्रम अद्याप कायम आहे.योजना कागदावरचज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या. संबंधित अधिकारी योजनांची अंमलबजावणी करीत नाही. ग्रामीण भागात एसटी महत्त्वाचा आधार मानली जाते. पण, प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळत नाही. नियम कागदावरच राहतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.