शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

स्वहितासाठी संचालकच करताहेत बदनामी

By admin | Updated: December 13, 2014 22:35 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे,

शेखर धोटे म्हणतात : आपला कार्यकाळ इतरांहून चांगलाचचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष धोटे यांनी बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे आणि कार्यप्रणालीचे दाखले देत विरोधकांवर टीका केली. यावेळी उपाध्यक्ष प्रभा वासाडे, संचालक संजय सिंगम, मनोहर पाऊणकर, पुंडलिक कढव, संजय तोटावार, अनिल खनके, डॉ. अनिल वाढई, यशवंत दिघोरे उपस्थित होते. आरोपकर्त्या संचालकाचा नामोल्लेख टाळून धोटे म्हणाले, बँकेतील कर्मचारी भरतीमध्ये देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे. मात्र या आरोपात सहभागी असलेले संचालकच स्वत: भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत. या बँकेत मार्च २००९ मध्ये १३८ आणि आॅगस्ट २००९ मध्ये ९२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नव्या पदांमुळे बँकेवर आर्थिक भार पडला. प्रत्यक्षात २००८ आणि २००९ मधील सरळ सेवा भरतीदरम्यान अनुकंपाधारकांचा हक्क डावलण्यात आला.२००९ मधील भरतीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आजही न्यायालयात सुरू आहे. या काळात स्वत: रवींद्र शिंदे अध्यक्ष होते. मात्र आपल्या कार्यकाळात आपण बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता आणली. त्यासाठी समिती गठीत केली. त्यात बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांसह रवींद्र शिंदे, नंदा अल्लूरवार यांच्यासह अन्य संचालकही सदस्य आहेत. या प्रकरणी कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. आपला वयैक्तिक विरोध असेल तर तो वैयक्तिक पातळीवर व्हावा, मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला या बदनामीमुळे तडा जाऊ नये, एवढीच आपली अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)