शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

शासकीय कार्यालयात आता थेट प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST

कोरोनामुळे जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाली. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेतंर्गत ...

कोरोनामुळे जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाली. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेतंर्गत संचारबंदी लागू केली. मात्र, रुग्णसंख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. दररोज एक हजारहून जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेने अंमजबजावणीही सुरू केली आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या उपाययोजनांचे पालन केले तरच प्रवेश देण्यात येईल. तातडीच्या परिस्थितीत भेटायचे असेल तर ४८ तासांच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरही याच संदेशाचा पलक लावण्यात आला. अभ्यागतांना काही समस्यांचा निपटारा करण्यासाठी भेटण्यापूर्वी आता ई-मेल व संकेतस्थळांवर अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

सार्वजनिक व व्यक्तिगत समस्यांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेत शेकडो नागरिक ग्रामीण भागातून येतात. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अशा व्यक्तींचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेतही ‘नो एंट्री’

जिल्हा परिषदेतही आता अधिकाऱ्यांना सहजपणे भेटता येणार नाही. प्रशासकीय इमारतीत शिष्टमंडळ घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मास्क व प्रवेशपत्र अनिवार्य करण्यात आले. मात्र, समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना परत पाठविले जाणार नाही. कोविड ९० प्रतिबंधानुसार खबरदारी घेऊन समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.