शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

शासकीय कार्यालयात आता थेट प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST

कोरोनामुळे जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाली. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेतंर्गत ...

कोरोनामुळे जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाली. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेतंर्गत संचारबंदी लागू केली. मात्र, रुग्णसंख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. दररोज एक हजारहून जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेने अंमजबजावणीही सुरू केली आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या उपाययोजनांचे पालन केले तरच प्रवेश देण्यात येईल. तातडीच्या परिस्थितीत भेटायचे असेल तर ४८ तासांच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरही याच संदेशाचा पलक लावण्यात आला. अभ्यागतांना काही समस्यांचा निपटारा करण्यासाठी भेटण्यापूर्वी आता ई-मेल व संकेतस्थळांवर अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

सार्वजनिक व व्यक्तिगत समस्यांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेत शेकडो नागरिक ग्रामीण भागातून येतात. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अशा व्यक्तींचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेतही ‘नो एंट्री’

जिल्हा परिषदेतही आता अधिकाऱ्यांना सहजपणे भेटता येणार नाही. प्रशासकीय इमारतीत शिष्टमंडळ घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मास्क व प्रवेशपत्र अनिवार्य करण्यात आले. मात्र, समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना परत पाठविले जाणार नाही. कोविड ९० प्रतिबंधानुसार खबरदारी घेऊन समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.