शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४५ हजार कीटनाशके विक्रेते घेणार पदविका प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST

चंद्रपूर : किमान शैक्षणिक पात्रता नसताना केवळ अनुभव व माहितीच्या आधारावर व्यवसाय करूनही कीटकनाशके हाताळणी व विक्रीसंदर्भात गंभीर चुका ...

चंद्रपूर : किमान शैक्षणिक पात्रता नसताना केवळ अनुभव व माहितीच्या आधारावर व्यवसाय करूनही कीटकनाशके हाताळणी व विक्रीसंदर्भात गंभीर चुका पुढे आल्याने केंद्र सरकारने एक वर्षाचा शास्त्रोक्त पदविका अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम राज्यातील ४५ हजार कीटकनाशक विक्रेत्यांना पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, कोविडमुळे प्रशिक्षण व प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे.

कृषी केंद्रांमधून कीडनाशकांची विक्री, वितरण तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्ती किमान पदवीधारक असावा, ही अट केंद्र सरकारने लागू केली. यासाठी केंद्रीय कीटकनाशक कायद्यातही बदल करण्यात आला. परिणामी, अनेक वर्षांपासून अनुभवाच्या आधारे कीटनाशक विक्री करणाऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली. कृषी पदवीच नसल्याने नवीन कायद्यानुसार कीडनाशके व्यवसायातून बाद होण्याची वेळ आली. प्रामुख्याने जुन्या विक्रेत्यांसमोर ही समस्या उभी ठाकली. ऑल इंडिया अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशन व अन्य संघटनांनी याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर किमान शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

असे आहे अभ्यासक्रमाचे स्वरूप

अभ्यासक्रम तयार करण्यास कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयांनी सहकार्य केले. परीक्षा व संनियंत्रणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या एआयडीपीआर व हैदराबाद येथील मॅनेज या दोन संस्थांकडे आहे. राज्यातील कृषी विभाग आत्मा, नागपुरातील वनामती संस्थेचीही महत्त्वाची भूमिका आहे. यात कृषिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन व जीवशास्त्राशी निगडित विविध विषयांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दोन केंद्र

चंद्रपूर जिल्ह्यात कृषी तंत्रनिकेतन आनंदवन वरोरा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रत्येकी एकप्रमाणे दोन केंद्र सुरू आहेत. दोनही केंद्रातून १६० विक्रेते प्रशिक्षित झाले. त्यापुढील बॅचेसलाही प्रवेश देण्यात आला. सध्या कोविडमुळे प्रशिक्षण बंद आहे.

कोट

अभ्यासक्रमाचे स्वरूप अत्यंत उपयुक्त आहे. प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण अथवा प्रवेशित तसेच कीटकनाशके विक्री परवानाधारक असावा. उपस्थितीसाठी बायोमेट्रिकचा वापर होतो. अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच प्रवेश मिळतो. एका बॅचमध्ये ४० जण असतात. आठवड्यातून एक दिवस वर्ग भरतो. विक्रेत्यांनी मन लावून ज्ञान मिळविल्यास शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर होतील.

-प्राचार्य हर्षदा पोतदार, कृषी तंत्रनिकेतन आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर