शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांच्या उपस्थितीत बैठक : जलसंपदा विभागाच्या सचिवांची घोषणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तथापि, विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदलादेखील दिवाळीनंतर लगेच दिला जाईल, अशी घोषणा जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत केली.२००२ ला मंजूर झालेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. तथापि आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना.हंसराज अहीर यांनी याप्रकरणी तोडगा काढला असून विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक क्षमतेने शेतकºयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आता ५७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. पूर्वी या प्रकल्पातून केवळ १९ दलघमी पाणी देण्याचे ठरले होते. तथापि औद्योगिक वापरासाठी आता पाणीसाठा कमी करण्यात आला असून सिंचनासाठी मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया या प्रकल्पामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मोबदला उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अनेक शेतकºयांनी न्यायालयीन प्रक्रियाही सुरू केली होती. त्यामुळे हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. तथापि, राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाला पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूणच सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकºयांनी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीला शेतकºयांची देखिल उपस्थिती होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता बलवंत स्वामी उपस्थित होते.