शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांच्या उपस्थितीत बैठक : जलसंपदा विभागाच्या सचिवांची घोषणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तथापि, विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदलादेखील दिवाळीनंतर लगेच दिला जाईल, अशी घोषणा जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत केली.२००२ ला मंजूर झालेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. तथापि आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना.हंसराज अहीर यांनी याप्रकरणी तोडगा काढला असून विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक क्षमतेने शेतकºयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आता ५७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. पूर्वी या प्रकल्पातून केवळ १९ दलघमी पाणी देण्याचे ठरले होते. तथापि औद्योगिक वापरासाठी आता पाणीसाठा कमी करण्यात आला असून सिंचनासाठी मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया या प्रकल्पामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मोबदला उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अनेक शेतकºयांनी न्यायालयीन प्रक्रियाही सुरू केली होती. त्यामुळे हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. तथापि, राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाला पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूणच सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकºयांनी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीला शेतकºयांची देखिल उपस्थिती होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता बलवंत स्वामी उपस्थित होते.