शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:15 IST

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.

ठळक मुद्देविहिरीतून घेतात पाणी विकत : पाणीपुरवठा नळयोजना आटली, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.राजुरा तालुकास्थळापासून २२ कि. मी. अंतरावर असलेले पाचगाव हे दाट लोकसंख्या असलेले गाव. उन्हाळा आला की या गावातील पाण्याचे स्रोत हळूहळू आटायला सुरू होतात. पाचगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खाली गेली आहे. पाचगाव येथे दोन शासकीय विहिरी आहेत. संपूर्ण गाव याच विहिरीवर पाणी भरायचा. मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याने विहिरीचा तळ गाठला आहे. गावात पाणीपुरवठा नळयोजना आहे. पंरतु टाकीला पाणीपुरवठा करणारी विहीरच आटल्याने नळयोजना प्रभावित झाली आहे. विहिरीत तीन-चार दिवस पाणी साठवणूक झाल्यानंतर चार दिवसाआड नळयोजनेचे पाणी गावकºयांना सोडले जाते. त्यामुळे पाचगाववासीयांची पाण्यासाठी भटंकती सुरू झाली. बैलबंडीने मिळेल तिथून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित होते. मात्र गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावापासून दोन कि.मी. अंतरावरील दूर शिवारात असलेल्या विहिरी गावकऱ्यांच्या पाण्यासाठी विकत घेतल्या. त्यामुळे नागरिकांना बैलबंडीवर ड्रम बांधून विहिरीतून पाणी उपसावे लागत आहे. पाचगाव परिसरात पाण्याची पातळी खालावून जलसंकट ओढवले आहे.पाझर तलावाची निर्मिती करावीपाचगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता गावातील घरगुती बोअरवेल, सरकारी विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. मात्र यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यासाठी शासनाने पाचगाव परिसरात पाझर तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, तंटामुक्त अध्यक्ष तिरूपती इंदूरवार, पं.स. सदस्य सुनंदा डोंगे, सुधाकर गेडेकर, शंकर गोनेलवार, किसन पिंपळकर, दशरथ भोयर, शंकर खामनकर, गंगाधर गेडेकर, लक्ष्मण तुलावार, रामदास खाडे यांनी केली आहे.पाचगाव येथील पाणीपुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. त्यामुळे गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने शिवारातील चार विहिरी पाण्यासाठी विकत घेऊन गावकºयांना पाण्याची सोय करून दिली आहे.- गोपाल जंबुलवार, उपसरपंच, पाचगाव.