शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:15 IST

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.

ठळक मुद्देविहिरीतून घेतात पाणी विकत : पाणीपुरवठा नळयोजना आटली, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.राजुरा तालुकास्थळापासून २२ कि. मी. अंतरावर असलेले पाचगाव हे दाट लोकसंख्या असलेले गाव. उन्हाळा आला की या गावातील पाण्याचे स्रोत हळूहळू आटायला सुरू होतात. पाचगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खाली गेली आहे. पाचगाव येथे दोन शासकीय विहिरी आहेत. संपूर्ण गाव याच विहिरीवर पाणी भरायचा. मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याने विहिरीचा तळ गाठला आहे. गावात पाणीपुरवठा नळयोजना आहे. पंरतु टाकीला पाणीपुरवठा करणारी विहीरच आटल्याने नळयोजना प्रभावित झाली आहे. विहिरीत तीन-चार दिवस पाणी साठवणूक झाल्यानंतर चार दिवसाआड नळयोजनेचे पाणी गावकºयांना सोडले जाते. त्यामुळे पाचगाववासीयांची पाण्यासाठी भटंकती सुरू झाली. बैलबंडीने मिळेल तिथून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित होते. मात्र गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावापासून दोन कि.मी. अंतरावरील दूर शिवारात असलेल्या विहिरी गावकऱ्यांच्या पाण्यासाठी विकत घेतल्या. त्यामुळे नागरिकांना बैलबंडीवर ड्रम बांधून विहिरीतून पाणी उपसावे लागत आहे. पाचगाव परिसरात पाण्याची पातळी खालावून जलसंकट ओढवले आहे.पाझर तलावाची निर्मिती करावीपाचगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता गावातील घरगुती बोअरवेल, सरकारी विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. मात्र यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यासाठी शासनाने पाचगाव परिसरात पाझर तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, तंटामुक्त अध्यक्ष तिरूपती इंदूरवार, पं.स. सदस्य सुनंदा डोंगे, सुधाकर गेडेकर, शंकर गोनेलवार, किसन पिंपळकर, दशरथ भोयर, शंकर खामनकर, गंगाधर गेडेकर, लक्ष्मण तुलावार, रामदास खाडे यांनी केली आहे.पाचगाव येथील पाणीपुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. त्यामुळे गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने शिवारातील चार विहिरी पाण्यासाठी विकत घेऊन गावकºयांना पाण्याची सोय करून दिली आहे.- गोपाल जंबुलवार, उपसरपंच, पाचगाव.