शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:15 IST

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.

ठळक मुद्देविहिरीतून घेतात पाणी विकत : पाणीपुरवठा नळयोजना आटली, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.राजुरा तालुकास्थळापासून २२ कि. मी. अंतरावर असलेले पाचगाव हे दाट लोकसंख्या असलेले गाव. उन्हाळा आला की या गावातील पाण्याचे स्रोत हळूहळू आटायला सुरू होतात. पाचगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खाली गेली आहे. पाचगाव येथे दोन शासकीय विहिरी आहेत. संपूर्ण गाव याच विहिरीवर पाणी भरायचा. मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याने विहिरीचा तळ गाठला आहे. गावात पाणीपुरवठा नळयोजना आहे. पंरतु टाकीला पाणीपुरवठा करणारी विहीरच आटल्याने नळयोजना प्रभावित झाली आहे. विहिरीत तीन-चार दिवस पाणी साठवणूक झाल्यानंतर चार दिवसाआड नळयोजनेचे पाणी गावकºयांना सोडले जाते. त्यामुळे पाचगाववासीयांची पाण्यासाठी भटंकती सुरू झाली. बैलबंडीने मिळेल तिथून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित होते. मात्र गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावापासून दोन कि.मी. अंतरावरील दूर शिवारात असलेल्या विहिरी गावकऱ्यांच्या पाण्यासाठी विकत घेतल्या. त्यामुळे नागरिकांना बैलबंडीवर ड्रम बांधून विहिरीतून पाणी उपसावे लागत आहे. पाचगाव परिसरात पाण्याची पातळी खालावून जलसंकट ओढवले आहे.पाझर तलावाची निर्मिती करावीपाचगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता गावातील घरगुती बोअरवेल, सरकारी विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. मात्र यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यासाठी शासनाने पाचगाव परिसरात पाझर तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, तंटामुक्त अध्यक्ष तिरूपती इंदूरवार, पं.स. सदस्य सुनंदा डोंगे, सुधाकर गेडेकर, शंकर गोनेलवार, किसन पिंपळकर, दशरथ भोयर, शंकर खामनकर, गंगाधर गेडेकर, लक्ष्मण तुलावार, रामदास खाडे यांनी केली आहे.पाचगाव येथील पाणीपुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. त्यामुळे गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने शिवारातील चार विहिरी पाण्यासाठी विकत घेऊन गावकºयांना पाण्याची सोय करून दिली आहे.- गोपाल जंबुलवार, उपसरपंच, पाचगाव.