शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

खासगी जमिनीवर खोदकाम

By admin | Updated: May 10, 2014 00:05 IST

राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे.

 राजुरा : राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे. खोलीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र यात खासगी जमिनीवर बुलडोजर चालवून जमिनीवर खड्डे केले जात आहे. त्यामुळे जमीनमालक चांगलेच त्रस्त झाले आहे. ज्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे, त्या तलावाला लागूनच राजा बाना कलेगुरवार यांचा सर्वे क्रमांक १२७ भाग- २ मध्ये १.२० हेक्टर जमिनीचा पट्टा २३ जानेवारी १९९० ला राजुर्‍याचे तहसीलदार यांनी दिला. या पट्टयाची जमीन तलावाला लागूनच असल्यामुळे या खासगी जमिनीवरसुद्धा नगरपालिकेचा बुलडोजर चालत आहे. त्यांची पट्टयाची जमीन नासधूस करून खड्डा केला आहे. त्यामुळे राजा कलेगुरवार यांनी राजुरा पोलीस ठाण्यामध्ये मुख्याधिकारी यांच्या विरोधात जबरदस्ती पट्टयाच्या जमिनीवर खोदकाम करीत असल्याची तक्रार दिली. या प्रकरणाबाबत तहसीलदार एस.पी. खलाटे यांच्या दालनात नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगर परिषदेचे अभियंता रवी जामूनकर आणि पट्टेधारक राजा कलेगुरवार यांची बैठक झाली. तहसीलदार यांनी पट्टयाची जमीन असल्यामुळे खोदकाम करता येत नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. तरीसुद्धा खोदकाम सुरूच असल्याचे राजा कलेगुवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नगर परिषदेच्या सौदर्यीकरणाच्या प्रकरणात नगर परिषद राजुराचे नगरसेवक शरिफ सिद्धीकी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सौदर्यीकरणातून खोदकाम करून निघणारी माती राजुरा शहराच्या ओपनस्पेसवर टाकण्याचे कत्राटात म्हटले आहे. परंतु ही तलावातून निघणारी सुपीक माती खासगी ले-आऊटमध्ये नेऊन टाकण्यात येत असल्याचा आरोप शरीफ सिद्धीकी यांनी तक्रारीत केला आहे. या तलावातून निघणारी शेकडो ब्रास माती खासगी ले-आऊटमध्ये टाकण्यात येत आहे. हे नियमबाह्य असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजुरा शहरातील तलावाच्या सौदर्यीकरणामुळे शहरातील पाण्याची पातळी वाढणार असून एक नाविण्यपूर्ण योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व निकष पूर्ण करूनच काम करण्यात येत असल्याचे मत राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केले. तलावाला लागून असलेल्या जमिनीचे पट्टेधारक राजा कलेगुरवार यांनी, आपल्या जमिनीवरील खोदकाम न थांबविल्यास आपण नगर परिषदेपुढे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत तलाव सौदर्यीकरणात वेगवेगळे पैलू पुढे येत असून प्रत्येक बाबीवर लक्ष पुरविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)