शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

खासगी जमिनीवर खोदकाम

By admin | Updated: May 10, 2014 00:05 IST

राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे.

 राजुरा : राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे. खोलीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र यात खासगी जमिनीवर बुलडोजर चालवून जमिनीवर खड्डे केले जात आहे. त्यामुळे जमीनमालक चांगलेच त्रस्त झाले आहे. ज्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे, त्या तलावाला लागूनच राजा बाना कलेगुरवार यांचा सर्वे क्रमांक १२७ भाग- २ मध्ये १.२० हेक्टर जमिनीचा पट्टा २३ जानेवारी १९९० ला राजुर्‍याचे तहसीलदार यांनी दिला. या पट्टयाची जमीन तलावाला लागूनच असल्यामुळे या खासगी जमिनीवरसुद्धा नगरपालिकेचा बुलडोजर चालत आहे. त्यांची पट्टयाची जमीन नासधूस करून खड्डा केला आहे. त्यामुळे राजा कलेगुरवार यांनी राजुरा पोलीस ठाण्यामध्ये मुख्याधिकारी यांच्या विरोधात जबरदस्ती पट्टयाच्या जमिनीवर खोदकाम करीत असल्याची तक्रार दिली. या प्रकरणाबाबत तहसीलदार एस.पी. खलाटे यांच्या दालनात नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगर परिषदेचे अभियंता रवी जामूनकर आणि पट्टेधारक राजा कलेगुरवार यांची बैठक झाली. तहसीलदार यांनी पट्टयाची जमीन असल्यामुळे खोदकाम करता येत नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. तरीसुद्धा खोदकाम सुरूच असल्याचे राजा कलेगुवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नगर परिषदेच्या सौदर्यीकरणाच्या प्रकरणात नगर परिषद राजुराचे नगरसेवक शरिफ सिद्धीकी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सौदर्यीकरणातून खोदकाम करून निघणारी माती राजुरा शहराच्या ओपनस्पेसवर टाकण्याचे कत्राटात म्हटले आहे. परंतु ही तलावातून निघणारी सुपीक माती खासगी ले-आऊटमध्ये नेऊन टाकण्यात येत असल्याचा आरोप शरीफ सिद्धीकी यांनी तक्रारीत केला आहे. या तलावातून निघणारी शेकडो ब्रास माती खासगी ले-आऊटमध्ये टाकण्यात येत आहे. हे नियमबाह्य असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजुरा शहरातील तलावाच्या सौदर्यीकरणामुळे शहरातील पाण्याची पातळी वाढणार असून एक नाविण्यपूर्ण योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व निकष पूर्ण करूनच काम करण्यात येत असल्याचे मत राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केले. तलावाला लागून असलेल्या जमिनीचे पट्टेधारक राजा कलेगुरवार यांनी, आपल्या जमिनीवरील खोदकाम न थांबविल्यास आपण नगर परिषदेपुढे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत तलाव सौदर्यीकरणात वेगवेगळे पैलू पुढे येत असून प्रत्येक बाबीवर लक्ष पुरविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)