शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जमिनीवर खोदकाम

By admin | Updated: May 10, 2014 00:05 IST

राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे.

 राजुरा : राजुरा शहरातील तलाव सौदर्यीकरणासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ८० लाख रुपये केवळ तलावाच्या खोलीकरणावर खर्च होत आहे. खोलीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र यात खासगी जमिनीवर बुलडोजर चालवून जमिनीवर खड्डे केले जात आहे. त्यामुळे जमीनमालक चांगलेच त्रस्त झाले आहे. ज्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे, त्या तलावाला लागूनच राजा बाना कलेगुरवार यांचा सर्वे क्रमांक १२७ भाग- २ मध्ये १.२० हेक्टर जमिनीचा पट्टा २३ जानेवारी १९९० ला राजुर्‍याचे तहसीलदार यांनी दिला. या पट्टयाची जमीन तलावाला लागूनच असल्यामुळे या खासगी जमिनीवरसुद्धा नगरपालिकेचा बुलडोजर चालत आहे. त्यांची पट्टयाची जमीन नासधूस करून खड्डा केला आहे. त्यामुळे राजा कलेगुरवार यांनी राजुरा पोलीस ठाण्यामध्ये मुख्याधिकारी यांच्या विरोधात जबरदस्ती पट्टयाच्या जमिनीवर खोदकाम करीत असल्याची तक्रार दिली. या प्रकरणाबाबत तहसीलदार एस.पी. खलाटे यांच्या दालनात नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगर परिषदेचे अभियंता रवी जामूनकर आणि पट्टेधारक राजा कलेगुरवार यांची बैठक झाली. तहसीलदार यांनी पट्टयाची जमीन असल्यामुळे खोदकाम करता येत नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. तरीसुद्धा खोदकाम सुरूच असल्याचे राजा कलेगुवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नगर परिषदेच्या सौदर्यीकरणाच्या प्रकरणात नगर परिषद राजुराचे नगरसेवक शरिफ सिद्धीकी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सौदर्यीकरणातून खोदकाम करून निघणारी माती राजुरा शहराच्या ओपनस्पेसवर टाकण्याचे कत्राटात म्हटले आहे. परंतु ही तलावातून निघणारी सुपीक माती खासगी ले-आऊटमध्ये नेऊन टाकण्यात येत असल्याचा आरोप शरीफ सिद्धीकी यांनी तक्रारीत केला आहे. या तलावातून निघणारी शेकडो ब्रास माती खासगी ले-आऊटमध्ये टाकण्यात येत आहे. हे नियमबाह्य असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजुरा शहरातील तलावाच्या सौदर्यीकरणामुळे शहरातील पाण्याची पातळी वाढणार असून एक नाविण्यपूर्ण योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व निकष पूर्ण करूनच काम करण्यात येत असल्याचे मत राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केले. तलावाला लागून असलेल्या जमिनीचे पट्टेधारक राजा कलेगुरवार यांनी, आपल्या जमिनीवरील खोदकाम न थांबविल्यास आपण नगर परिषदेपुढे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत तलाव सौदर्यीकरणात वेगवेगळे पैलू पुढे येत असून प्रत्येक बाबीवर लक्ष पुरविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)