शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

सूक्ष्म, लघु व्यवसायांवर अवकळा; हजारो हात रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार ...

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार मिळत होता. परंतु, गुंतवणुकीसाठी शासनाकडून भांडवल मिळण्यास अनेक अडचणी वाढल्या. ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने मागणीला उठाव नसतानाच कोरोनाने पुन्हा संकटात घातली. त्यामुळे सूक्ष्म व लघु व्यवसायांवर अवकळा आली असून हजारो हात रिकामे आहेत.

नऊ तालुक्यांतील रोजगाराची स्थिती तर चिंताजनक असल्याचे वास्तव पुढे आहे.

जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६५ टक्क्यांहून जास्त आहे. प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागात राहणाऱ्या या समुदायाला शेतीतून वर्षभर रोजगार मिळणे कठीण आहे. थोडेफार शिक्षण घेतलेली नवीन पिढी शेतातील कष्टाची कामे करण्यास कचरते शिवाय, शेतीसमोरही अनेक संकटे उभी आहेत. अशा स्थितीत या भागातील कृषीपूरक व्यवसाय संस्था, दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल्स उपहारगृहांमध्ये सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्तींना रोजगार मिळत होता. २०१८-१९ या कालावधीत सूक्ष्म व लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांकडून सहजपणे भांडवल मिळत होते. मात्र, त्यानंतर स्थिती बदलली. कोरोनाकाळाने तर समस्यांची तीव्रता पुन्हा वाढविली. त्यामुळे हजारोंना रोजगार पुरविणाऱ्या सूक्ष्म-लघु व्यवसायांवर अवकळा आल्याचे उद्योग विभागाच्या अहवालातून दिसून येते.

कृषी क्षेत्रावर वाढला ताण

सन २०१७-१८ वर्षात २३ हजार ४८२ दुकानांतून २० हजार २२० व्यक्तींना रोजगार मिळाला. व्यापारी संघ ११ हजार ५४० व्यापारी संघातून १३ हजार ३८०, १ हजार ७३ हॉटेल उपहारगृह ४ हजार ७३९ व तत्सम सूक्ष्म व्यवसायातून ग्रामीण भागातील ३८ हजार ४२३ कामगारांच्या हाताला मिळाले. त्यामुळे शेतीवरील ताण हलका झाला परंतु, सध्याचे चित्र उलट झाल्याचे दिसून येत आहे.

२०१८ पासून रोजगारात घसरण

सन २०१८-१९ मध्ये ४ हजार ४७१ दुकानांमधून ११ हजार ५४७ जणांना रोजगार मिळाला. शिवाय, २ हजार ६९८ व्यापारी संस्थांमधून ११ हजार १०१ व्यक्तींना, ४४५ व्यापारी संस्थांमधून १ हजार ४८० व इतर संस्थांकडून २४ हजार ६३६ व्यक्तींना रोजगार मिळाला होता. २०७-१८ च्या तुलनेत १३ हजार ७८७ जणांचा रोजगार हिसकावला. सन २०१८-१९ पासून तर २०२० पर्यंत सातत्याने रोजगारात घट होत आहे.

पाच तालुक्यांतच रोजगाराच्या संधी

दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृह तसेच तत्सम सूक्ष्म व्यवसाय वर्गवारीत चिमूर, नागभीड, सावली, सिंदेवाही, भद्रावती, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रोजगाराचे मार्ग बंद झाले. मात्र, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल व बल्लारपूर तालुक्यात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

सूक्ष्म उद्योगातील गुंतवणूक (लाखात)

वरोरा १३५, चिमूर १२०, नागभीड ११७, ब्रह्मपुरी १५१, सावली ३०, सिंदेवाही ५१, भद्रावती ११४, चंद्रपूर १५६८, मूल ६१६, बल्लारपूर १०४, पोंभुर्णा ७५, कोरपना ६२, राजुरा ७४, गोंडपिपरी ४३ व जिवती तालुक्यातील सूक्ष्म उद्योगांसाठी ३६ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये गुंतवणूक घटल्याने सूक्ष्म उद्योगांमध्ये रोजगार पुरविण्याची क्षमताही कमी झाली नाही.