शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म, लघु व्यवसायांवर अवकळा; हजारो हात रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार ...

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार मिळत होता. परंतु, गुंतवणुकीसाठी शासनाकडून भांडवल मिळण्यास अनेक अडचणी वाढल्या. ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने मागणीला उठाव नसतानाच कोरोनाने पुन्हा संकटात घातली. त्यामुळे सूक्ष्म व लघु व्यवसायांवर अवकळा आली असून हजारो हात रिकामे आहेत.

नऊ तालुक्यांतील रोजगाराची स्थिती तर चिंताजनक असल्याचे वास्तव पुढे आहे.

जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६५ टक्क्यांहून जास्त आहे. प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागात राहणाऱ्या या समुदायाला शेतीतून वर्षभर रोजगार मिळणे कठीण आहे. थोडेफार शिक्षण घेतलेली नवीन पिढी शेतातील कष्टाची कामे करण्यास कचरते शिवाय, शेतीसमोरही अनेक संकटे उभी आहेत. अशा स्थितीत या भागातील कृषीपूरक व्यवसाय संस्था, दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल्स उपहारगृहांमध्ये सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्तींना रोजगार मिळत होता. २०१८-१९ या कालावधीत सूक्ष्म व लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांकडून सहजपणे भांडवल मिळत होते. मात्र, त्यानंतर स्थिती बदलली. कोरोनाकाळाने तर समस्यांची तीव्रता पुन्हा वाढविली. त्यामुळे हजारोंना रोजगार पुरविणाऱ्या सूक्ष्म-लघु व्यवसायांवर अवकळा आल्याचे उद्योग विभागाच्या अहवालातून दिसून येते.

कृषी क्षेत्रावर वाढला ताण

सन २०१७-१८ वर्षात २३ हजार ४८२ दुकानांतून २० हजार २२० व्यक्तींना रोजगार मिळाला. व्यापारी संघ ११ हजार ५४० व्यापारी संघातून १३ हजार ३८०, १ हजार ७३ हॉटेल उपहारगृह ४ हजार ७३९ व तत्सम सूक्ष्म व्यवसायातून ग्रामीण भागातील ३८ हजार ४२३ कामगारांच्या हाताला मिळाले. त्यामुळे शेतीवरील ताण हलका झाला परंतु, सध्याचे चित्र उलट झाल्याचे दिसून येत आहे.

२०१८ पासून रोजगारात घसरण

सन २०१८-१९ मध्ये ४ हजार ४७१ दुकानांमधून ११ हजार ५४७ जणांना रोजगार मिळाला. शिवाय, २ हजार ६९८ व्यापारी संस्थांमधून ११ हजार १०१ व्यक्तींना, ४४५ व्यापारी संस्थांमधून १ हजार ४८० व इतर संस्थांकडून २४ हजार ६३६ व्यक्तींना रोजगार मिळाला होता. २०७-१८ च्या तुलनेत १३ हजार ७८७ जणांचा रोजगार हिसकावला. सन २०१८-१९ पासून तर २०२० पर्यंत सातत्याने रोजगारात घट होत आहे.

पाच तालुक्यांतच रोजगाराच्या संधी

दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृह तसेच तत्सम सूक्ष्म व्यवसाय वर्गवारीत चिमूर, नागभीड, सावली, सिंदेवाही, भद्रावती, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रोजगाराचे मार्ग बंद झाले. मात्र, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल व बल्लारपूर तालुक्यात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

सूक्ष्म उद्योगातील गुंतवणूक (लाखात)

वरोरा १३५, चिमूर १२०, नागभीड ११७, ब्रह्मपुरी १५१, सावली ३०, सिंदेवाही ५१, भद्रावती ११४, चंद्रपूर १५६८, मूल ६१६, बल्लारपूर १०४, पोंभुर्णा ७५, कोरपना ६२, राजुरा ७४, गोंडपिपरी ४३ व जिवती तालुक्यातील सूक्ष्म उद्योगांसाठी ३६ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये गुंतवणूक घटल्याने सूक्ष्म उद्योगांमध्ये रोजगार पुरविण्याची क्षमताही कमी झाली नाही.