शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२० जणांनी दिले काळ्या आईला अंतर

By admin | Updated: April 29, 2016 01:01 IST

राज्यात वर्षभरात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून जीवन संपविले.

अन्नदात्यांची वैफल्यग्रस्त व्यथा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरराज्यात वर्षभरात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असा हतबल झाला आहे, विदर्भातील याचे प्रमाण अधिक आहे. याला अपवाद चंद्रपूर जिल्हाही ठरला नाही. मागील चार महिन्यात जिल्ह्यातील २० जणांनी काळ्या आईला अंतर देत जीवन प्रवास थांबविला आहे. समाजाचा आधारस्तंभ कोसळत असताना वैफल्यग्रस्त अन्नदात्यांची व्यथा राज्यकर्त्यांना आजतागायत जाणून घेता आलीच नाही, हे विदारक सत्य आहे.बळीराजा मानव जातीचा व पशुपक्षांचा पोशिंदा आहे. व्यवसाय करता येत नाही, म्हणून पिढ्यानं पिढ्यापासून ऋणानुबंध जोपासून शेती करतो. त्यांच्या परिश्रमातून घराघरातील अन्नपूर्णा प्रसन्न असते. नांगर, बैलजोडी, पशुधन, फावडे, कुदळ, खुरपणे आणि शिवारातील माती हाच त्याचा नित्यक्रम असतो. याचेशी बळीराजाचे भावनिक नाते जडले आहे. मात्र निसर्गाचे दुष्टचक्र फिरते. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या चक्रव्यूहात अलगद अडकतो. ‘काळी आई’ त्याचे अपार प्रेम करते. मात्र नापिकी, अतिवृष्टी तर अवर्षण संकटाशी दोन हात करताना नाउमेद होवून मृत्यूला जवळ घेतो. बळीराजाच्या मृत्यूची किंमत शासनाने एक लाख रुपये निर्धारित केली आहे. यातून त्यांच्या मुलाबाळांचे अश्रु पुसण्याचा देखावा निर्माण केला आहे. त्यांचे सांत्वन करण्यापलिकडे काही सोपस्कार नाही. ती तत्कालिन स्वरुपाची आहे. शेती करुन फायदा काय, या विंवचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शेती फायदेशीर होण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यातील जिद्दीच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी तजविज करण्याची गरज असून तेव्हाच शेतकरी जगेल. या शेतकऱ्यांनी केली आत्महत्याचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पाहर्णी गावातील सुरेश शामराव कुंभरे (४१) याने याच कारणावरुन २४ जानेवारीला विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. याच तालुक्यातील देविदास तुळशीराम थेरकर (४०) रा. गोविंदपूर, रामदास मारोती घ्यार (४५) रा. मांगली, मनोज एकनाथ पिंपळशेंडे (४५) रा. मार्डा ता. वरोरा, प्रशांत भाऊराव टोेंगे (५५) रा. नंदोरी ता. भद्रावती, गुरुदेव किसन चलाख (५५) रा. करोडा ता. सावली, हरिश्चंद्र परशुराम चनेकर (२६) रा. धाबा ता. गोंडपिंपरी, विनायक सिताराम चौधरी (५७) रा. गोजोली ता. गोंडपिंपरी, रितेश गोपाळराव ढेंगळे (५५) रा. चिनोरा ता. वरोरा, संजय प्रभाकर बदकी (३१) रा. महालगाव ता. वरोरा, तेजराज विठोबा बोरकर (४७) रा. नवरगाव ता. सिंदेवाही, दिलीप बाबुराव कामडी (३८) रा. कळमगाव गन्ना ता. सिंदेवाही यांच्यासह २० जणांनी तीन महिन्याचा कालावधीत कर्ज आणि नापिकीला कंटाळून संघर्षमय जीवनाला हताश होता काळ्या आईला निराधार करीत अंतर दिल्याच्या घटना घडल्या आहेत.