शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

२० जणांनी दिले काळ्या आईला अंतर

By admin | Updated: April 29, 2016 01:01 IST

राज्यात वर्षभरात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून जीवन संपविले.

अन्नदात्यांची वैफल्यग्रस्त व्यथा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरराज्यात वर्षभरात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असा हतबल झाला आहे, विदर्भातील याचे प्रमाण अधिक आहे. याला अपवाद चंद्रपूर जिल्हाही ठरला नाही. मागील चार महिन्यात जिल्ह्यातील २० जणांनी काळ्या आईला अंतर देत जीवन प्रवास थांबविला आहे. समाजाचा आधारस्तंभ कोसळत असताना वैफल्यग्रस्त अन्नदात्यांची व्यथा राज्यकर्त्यांना आजतागायत जाणून घेता आलीच नाही, हे विदारक सत्य आहे.बळीराजा मानव जातीचा व पशुपक्षांचा पोशिंदा आहे. व्यवसाय करता येत नाही, म्हणून पिढ्यानं पिढ्यापासून ऋणानुबंध जोपासून शेती करतो. त्यांच्या परिश्रमातून घराघरातील अन्नपूर्णा प्रसन्न असते. नांगर, बैलजोडी, पशुधन, फावडे, कुदळ, खुरपणे आणि शिवारातील माती हाच त्याचा नित्यक्रम असतो. याचेशी बळीराजाचे भावनिक नाते जडले आहे. मात्र निसर्गाचे दुष्टचक्र फिरते. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या चक्रव्यूहात अलगद अडकतो. ‘काळी आई’ त्याचे अपार प्रेम करते. मात्र नापिकी, अतिवृष्टी तर अवर्षण संकटाशी दोन हात करताना नाउमेद होवून मृत्यूला जवळ घेतो. बळीराजाच्या मृत्यूची किंमत शासनाने एक लाख रुपये निर्धारित केली आहे. यातून त्यांच्या मुलाबाळांचे अश्रु पुसण्याचा देखावा निर्माण केला आहे. त्यांचे सांत्वन करण्यापलिकडे काही सोपस्कार नाही. ती तत्कालिन स्वरुपाची आहे. शेती करुन फायदा काय, या विंवचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शेती फायदेशीर होण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यातील जिद्दीच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी तजविज करण्याची गरज असून तेव्हाच शेतकरी जगेल. या शेतकऱ्यांनी केली आत्महत्याचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पाहर्णी गावातील सुरेश शामराव कुंभरे (४१) याने याच कारणावरुन २४ जानेवारीला विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. याच तालुक्यातील देविदास तुळशीराम थेरकर (४०) रा. गोविंदपूर, रामदास मारोती घ्यार (४५) रा. मांगली, मनोज एकनाथ पिंपळशेंडे (४५) रा. मार्डा ता. वरोरा, प्रशांत भाऊराव टोेंगे (५५) रा. नंदोरी ता. भद्रावती, गुरुदेव किसन चलाख (५५) रा. करोडा ता. सावली, हरिश्चंद्र परशुराम चनेकर (२६) रा. धाबा ता. गोंडपिंपरी, विनायक सिताराम चौधरी (५७) रा. गोजोली ता. गोंडपिंपरी, रितेश गोपाळराव ढेंगळे (५५) रा. चिनोरा ता. वरोरा, संजय प्रभाकर बदकी (३१) रा. महालगाव ता. वरोरा, तेजराज विठोबा बोरकर (४७) रा. नवरगाव ता. सिंदेवाही, दिलीप बाबुराव कामडी (३८) रा. कळमगाव गन्ना ता. सिंदेवाही यांच्यासह २० जणांनी तीन महिन्याचा कालावधीत कर्ज आणि नापिकीला कंटाळून संघर्षमय जीवनाला हताश होता काळ्या आईला निराधार करीत अंतर दिल्याच्या घटना घडल्या आहेत.