शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव उपसा सिंचन योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:30 IST

मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा अपेक्षाभंग : निधी मंजूर होऊनही सिंचन प्रकल्पाचे काम अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी सिंचनाचे स्वप्न भंगल्याचे दिसून येत आहे.दहेगाव-माणकापूर या दोन्ही गावांत आदिवासींची संख्या मोठी आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनाम्यानुसार प्रकल्पाची किंमत २५ लाख २० हजार ४६७ रुपये एवढी आहे. २१ लाख रुपये खर्च करून फक्त उमा नदी काठावर एक पंपघर आणि नदीमध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. पंप घराला अल्पावधीतरच तळे गेल्याचे दिसून येते. पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या कामावर २१ लाख रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. पण प्रकल्प पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उमा नदीपासून तर दहेगावपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली. पाणी उपशासाठी दोन मोठे मोटारपंप खरेदी करण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रकल्पस्थळी कोणतीही यंत्रे दिसून आली नाहीत. प्रकल्पाला सात वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचले नाही. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीची सुधारणा होईल, असे वाटत होते. पण दहेगाव-माणकापूर या डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदिवासींचा अद्याप कोणताही फायदा झाला नाही. ही गावे चिंचाळा- केळझर जि.प. क्षेत्रात येते. या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. दहेगाव उपसा सिंचन योजना यशस्वी झाल्यास आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. पारंपरिक पिके टाळून शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करू शकतात. सरकारने जलशिवार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचनाची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उपसा सिंचन प्रकल्पांची उपेक्षा होत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.