शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

दहेगाव उपसा सिंचन योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:30 IST

मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा अपेक्षाभंग : निधी मंजूर होऊनही सिंचन प्रकल्पाचे काम अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी सिंचनाचे स्वप्न भंगल्याचे दिसून येत आहे.दहेगाव-माणकापूर या दोन्ही गावांत आदिवासींची संख्या मोठी आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनाम्यानुसार प्रकल्पाची किंमत २५ लाख २० हजार ४६७ रुपये एवढी आहे. २१ लाख रुपये खर्च करून फक्त उमा नदी काठावर एक पंपघर आणि नदीमध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. पंप घराला अल्पावधीतरच तळे गेल्याचे दिसून येते. पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या कामावर २१ लाख रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. पण प्रकल्प पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उमा नदीपासून तर दहेगावपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली. पाणी उपशासाठी दोन मोठे मोटारपंप खरेदी करण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रकल्पस्थळी कोणतीही यंत्रे दिसून आली नाहीत. प्रकल्पाला सात वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचले नाही. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीची सुधारणा होईल, असे वाटत होते. पण दहेगाव-माणकापूर या डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदिवासींचा अद्याप कोणताही फायदा झाला नाही. ही गावे चिंचाळा- केळझर जि.प. क्षेत्रात येते. या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. दहेगाव उपसा सिंचन योजना यशस्वी झाल्यास आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. पारंपरिक पिके टाळून शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करू शकतात. सरकारने जलशिवार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचनाची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उपसा सिंचन प्रकल्पांची उपेक्षा होत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.