शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

सिंदेवाही तालुक्यात धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 20, 2014 23:26 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले. आता शेतकरी दमदार पावसाची वाट बघत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. शेतातील विहिरीचे पाणी देवून पऱ्हे मोठे केले. दरम्यान जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. तीन नक्षत्रे कोरडी गेल्यावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पऱ्ह्यांना फायदा झाला. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर पंप सिंचन व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. पण जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहे. त्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत रोवणी केलेली नाही. फक्त पऱ्हे जगविण्याचे काम सुरू आहे. पावसाअभावी धानपीक खरीप हंगाम धोक्यात आला असून आता दमदार पावसाची गरज आहे.या तालुक्यातील तलाव, बोड्या, शेततळे अद्यापही कोरडेच असून नदी-नाल्यांना पाणी नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनापासून मुकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात ४० टक्क्यापेक्षा कमी रोवणीची कामे झाली आहे. ६० टक्के शेतकऱ्यांची रोवणी झालेली नाहीत. सिंदेवाही तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत. येथील गडमौशी तलाव पाहिजे त्या प्रमाणात भरलेले नाही. त्यामुळे ३०० हेक्टरवरील धान पऱ्हे रोवणीच्या प्रतिक्षेत आहेत. रोवणी झाली म्हणजे पिके हाती येत नाहीत. त्याला पावसाची गरज आहे. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. त्यात सिंदेवाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे. सिंदेवाही तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)