शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पोंभुर्णा तालुक्यातील धानपिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:31 IST

तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : तीव्र उन्हामुळे पिके कोमेजली

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्र्णा : तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकºयांची धानपीके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकºयांचे बहरलेले पीक पुन्हा संकटात सापडले आहे़यावर्षी धानपिकांच्या पºहे टाकवणीनंतर पाऊस उशीरा पडल्याने धानपिकांची रोवणी उशीरा करण्यात आली. त्यामुळे पीक ज्या स्थितीमध्ये पाहिजे, त्या स्थितीत नाही़ तरीही शेतकºयांनी हिंमत न सोडता शेतीची कामे सुरू ठेवली आहे.परंतु तब्बल एक महिन्यांपासून कडक ऊन तापत असल्याने याचा परिणाम मध्यम प्रतिच्या धान पिकांवर जास्त होत असून सदर धानपिक निसावण्याच्या उंबरठ्यावर आले आहे़ त्यातच उन्हाच्या दाहकतेने काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.किटकनाशक औषधांचा पुरवठा करावास्थानिक परिसरातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे व उत्पादीत खर्चानुसार भाव मिळत नसल्याने हतबल होवून कर्जबाजारी झाला आहे़ खासगी कृषी केंद्रातून महागडी औषधी घेऊन फ वारणी करणे त्यांच्यासाठी परवडणारे नाही. त्यामुळे अनेक गरीब शेतकरी औषधी घेऊन फ वारणी करू शकत नाही.पर्यायाने त्यांना पाहिजे तसे उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक स्तरावरुन मोफ त औषधी देण्याची मागणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतकºयांकडून करण्यात येऊ लागली आहे.