शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

धाबानगरी कोंडय्या नामाने दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:49 IST

परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती.

ठळक मुद्देयात्रा महोत्सव सात दिवस चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कधाबा : परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती.सर्वप्रथम संस्थानचे माजी अध्यक्ष बबनराव पत्तीवार, संस्थान सचिव किशोर अगस्ती व विश्वस्त मंडळ वाल्मिकी युवक मंडळ नारायण पेटकर व त्यांचा संच, हनुमंत चंदनगिरीवार, महालक्ष्मी महिला बचत गट अध्यक्ष कविता चनेकार व महिला मंडळ, स्वामी समर्थ महिला बचत गट अध्यक्ष माला सिडाम व महिला मंडळ व गावातील नागरिकांकडून ग्रामसफाई करण्यात आली. सकाळी ९ वाजता महाराजांच्या समाधीचा अध्यक्ष अमर बोडावार व वैष्णवी बोडलावार यांच्याकडून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील महिला कलश डोक्यावर पकडून हिरवा शालू परिधान करून एकसमान वेशात कलश यात्रेला सुरूवात झाली. महाराजांच्या मंदिरातून काढण्यात आलेली महाराजांची पालखी फुलांनी सजविलेली होती. कोंडय्या नामाचा जल्लोष सातत्याने सुरू होता. परिसरातील सोमनपली, हिवरा, डोंगरगाव, दरूर, चिंचोली, लाठी, विरूर स्टेशन, वेडगाव सकमूर, सोनापूर देशपांडे आदी गावातील भजन मंडळी, वारकरी भजन मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. अनेकांनी भक्तांना चहा पाण्याचे वितरण केले. समाजसेवी मंडळानी पालखीतील सहभागी भक्तांना अल्पोपहाराची व्यवस्था केली. वाल्मिकी युवक मंडळाकडून आलूपोहा, मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातील युवकांना मसाला भात व मठ्ठाचे वाटप करण्यात आले. तसेच वॉर्ड नं. २ मध्ये मुरमुरा - चिवडा व जिलेबी हे वाटप करण्यात आले. बरमाई मंदिर परिसरात मसाला भाताचेसुद्धा वाटप करण्यात आले. पालखी गावातून फिरून आल्यांनतर संस्थान अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी भजन मंडळीना त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भेट देण्यात आले व आरती महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या पालखीसाठी हजारो भाविक तेलंगणा व विदर्भातील होते, हे विशेष.