शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

धाडधाड... गोळ्या सुटताच एकच पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा ...

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा परीवर कुणाच्या हातात चहाचा प्याला होता. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक बंदुकीतून धाडधाड गोळ्या सुटल्याचा आवाज येताच सारे वातावरणच क्षणात बदलून गेले. एक बुरखाधारी एका हातात पिस्तूल घेऊन गोळ्या झाडत एका युवकाच्या मागे धावत होता. हे चित्रपटात दिसणारे दृश्य प्रत्यक्षात बघताना अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्यालाही गोळी लागेल... या भीतीने जो तो मिळेल त्या दिशेने पळत होता. काही क्षणात घडलेल्या या थराराने नेहमी हसत खेळत असलेला परिसर एकाएकी दहशतीत गेला. ज्यांनी ही घटना आखो देखी बघितली त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शहराच्या गजबजलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्स परिसरात अशी घटना घडेल हा विचार कोणीही केलेला नव्हता...ही घटना चंद्रपूरकरांना दहशतीत नेणारी असल्याच्या भीतीयुक्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या.

रघुवंशी काॅम्प्लेक्समध्ये अनेक दुकाने आहेत. बाजूलाच धनराज प्लाझा. येथेही गर्दी असते. या ठिकाणी दररोज हजारांवर नागरिकांची खरेदीसाठी ये-जा असतात. चंद्रपुरातील अतिशय सुरक्षित परिसर म्हणून मनात भीती न बाळगता नागरिक बिनधास्त वावरत असतात. बाजूला लागूनच आझाद गार्डन आहे. या ठिकाणी दररोज शहरातील कानाकोपऱ्यातील नागरिक सकाळी फिरायला येतात. शेकडो नागरिक व्यायाम करीत असतात. बाजूलाच एक पानटपरी आहे. या टपरीवर अनेकजण सकाळचा चहा घेतात. यावेळी शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर गप्पाही रंगतात. पहाटेपासूनच हा परिसर गजबजलेला असतो. या ठिकाणी हत्येचा कट रचला जातो. ही बाब चंद्रपूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. आरोपी गोळीबार करीत सुटला असता या परिसराची सुरक्षा सांभा‌ळत असलेल्या केसर नावाच्या व्यक्तीचा चिमुकला तेथे नेहमीप्रमाणे फिरत होता. तो आरोपीला आडवा आला होता. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. या घटनेने चंद्रपूरकर चांगलेच हादरले आहेत.

बल्लारपूरची वाटचाल पुन्हा गँगवाॅरकडे...

बल्लारपूर शहर एकेकाळी गँगवाॅरसाठी विदर्भात कुप्रसिद्ध होते. रात्री-दिवसाही हातात तलवारी घेऊन गुंड एकमेकांच्या मागे धावतानाचे प्रकार नेहमीचेच झाले होते. येथील गुंडांची सर्वत्र दहशत होती. कोणी-कोणाला मारत असले तरी मधात कोणी पडत नव्हता. वेकोलिचा परिसरही गुंडांच्या दहशतीत होता. कालांतराने हे गुंड आपसातच लढून संपले. तेव्हापासून ही दहशत काही प्रमाणात कमी झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा काही गुंड आपली दहशत गाजवू लागले. यातून सुरज बहुरिया हत्याकांड घडले आणि येथून बल्लारपुरात गँगवाॅरने पुन्हा डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.