शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

धाडधाड... गोळ्या सुटताच एकच पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा ...

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा परीवर कुणाच्या हातात चहाचा प्याला होता. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक बंदुकीतून धाडधाड गोळ्या सुटल्याचा आवाज येताच सारे वातावरणच क्षणात बदलून गेले. एक बुरखाधारी एका हातात पिस्तूल घेऊन गोळ्या झाडत एका युवकाच्या मागे धावत होता. हे चित्रपटात दिसणारे दृश्य प्रत्यक्षात बघताना अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्यालाही गोळी लागेल... या भीतीने जो तो मिळेल त्या दिशेने पळत होता. काही क्षणात घडलेल्या या थराराने नेहमी हसत खेळत असलेला परिसर एकाएकी दहशतीत गेला. ज्यांनी ही घटना आखो देखी बघितली त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शहराच्या गजबजलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्स परिसरात अशी घटना घडेल हा विचार कोणीही केलेला नव्हता...ही घटना चंद्रपूरकरांना दहशतीत नेणारी असल्याच्या भीतीयुक्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या.

रघुवंशी काॅम्प्लेक्समध्ये अनेक दुकाने आहेत. बाजूलाच धनराज प्लाझा. येथेही गर्दी असते. या ठिकाणी दररोज हजारांवर नागरिकांची खरेदीसाठी ये-जा असतात. चंद्रपुरातील अतिशय सुरक्षित परिसर म्हणून मनात भीती न बाळगता नागरिक बिनधास्त वावरत असतात. बाजूला लागूनच आझाद गार्डन आहे. या ठिकाणी दररोज शहरातील कानाकोपऱ्यातील नागरिक सकाळी फिरायला येतात. शेकडो नागरिक व्यायाम करीत असतात. बाजूलाच एक पानटपरी आहे. या टपरीवर अनेकजण सकाळचा चहा घेतात. यावेळी शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर गप्पाही रंगतात. पहाटेपासूनच हा परिसर गजबजलेला असतो. या ठिकाणी हत्येचा कट रचला जातो. ही बाब चंद्रपूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. आरोपी गोळीबार करीत सुटला असता या परिसराची सुरक्षा सांभा‌ळत असलेल्या केसर नावाच्या व्यक्तीचा चिमुकला तेथे नेहमीप्रमाणे फिरत होता. तो आरोपीला आडवा आला होता. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. या घटनेने चंद्रपूरकर चांगलेच हादरले आहेत.

बल्लारपूरची वाटचाल पुन्हा गँगवाॅरकडे...

बल्लारपूर शहर एकेकाळी गँगवाॅरसाठी विदर्भात कुप्रसिद्ध होते. रात्री-दिवसाही हातात तलवारी घेऊन गुंड एकमेकांच्या मागे धावतानाचे प्रकार नेहमीचेच झाले होते. येथील गुंडांची सर्वत्र दहशत होती. कोणी-कोणाला मारत असले तरी मधात कोणी पडत नव्हता. वेकोलिचा परिसरही गुंडांच्या दहशतीत होता. कालांतराने हे गुंड आपसातच लढून संपले. तेव्हापासून ही दहशत काही प्रमाणात कमी झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा काही गुंड आपली दहशत गाजवू लागले. यातून सुरज बहुरिया हत्याकांड घडले आणि येथून बल्लारपुरात गँगवाॅरने पुन्हा डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.