शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बाप्पाच्या स्थापनेसाठी भक्तांची लगबग

By admin | Updated: September 17, 2015 00:47 IST

शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, ...

चंद्रपूर : शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, यासाठी प्रशासनही सज्ज झाला आहे. पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी मंगळवारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, यासाठी गणेश मंडळानी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. पोलीस मुख्यालय येथे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, विज विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, मनपाचे उपायुक्त विजय इंगोले, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस निरिक्षक सिरसकर व शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.नियम हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी असतात, त्यामुळे नियमांचे पालन झालेच पाहिजे. वर्गणी ही वर्गणी असावी, जबरदस्ती नसावी, सार्वजनिक गणेश स्थापना करताना विविध परवानग्या घेऊनच स्थापना करावी, असे पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकगणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील. दीडशे पोलीस अधिकारी राहणार तैणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची खबरदारी बाळगली जाणार आहे.दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहनराज्यातील काही भागात भीषण दुष्काळ असून गणेश मंडळांनी आपल्या काही खर्चात कपात करता आली तर ती जरूर करावी व हा निधी राज्याच्या दुष्काळी भागाला द्यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी गणेश मंडळांना केले. दुष्काळी भागाला मदत करणे समाज म्हणून आपल दायित्व आहे. गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवून अनावश्यक खर्च न करता तो पैसा दुष्काळग्रस्तांना द्यावा व आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.रस्त्यावर मंडप उभारणाऱ्यांवर कारवाईगणेश मंडळाना लागणाऱ्या विविध परवानग्या मनपा, वीज विभाग, परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने दिल्या जातात. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणीही रस्त्यावर मंडप उभारु नये, जितक्या जागेची परवानगी असेल तितक्याच जागेवर मंडप उभारला जावा, वाहतुकीला अडथळा होता कामा नये, पीओपीच्या मूर्ती बसवू नये, परवानगी घेऊनच वीज वापरावी, निर्माल्य हे मनपाने ठेवलेल्या कलशातच टाकावे, मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी परिवहन विभागाकडून करून घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना गणेश मंडळांच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.