शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामे ठप्प : नागरिकांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 02:11 IST

सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांची संख्या असून लोकसंख्या १५ हजारच्या आसपास आहे. मागील अडीच-तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक भाजपा गट, काँग्रेस गट व गोपाल चिलबुले गट अशा तीन गटामध्ये लढल्या गेली. भाजपा गटाचे नऊ उमेदवार, काँग्रेस गटाचे चार उमेदवार तर चिलबुले गटाचे चार उमेदवार निवडून आले. मात्र सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा गटातील एक सदस्य फुटला आणि चिलबुले गटाला मिळाला. काँग्रेस व चिलबुले गट एकत्र आले. त्यामुळे भाजपा गटाकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य झाले. सरपंच पद राखीव असल्याने आठ मधील सरपंच झाल्या. म्हणजे ८ व ९ असे ८९ तसेच सरपंच पदाची निवडणुकही ८-९-२०१५ ला झाली. सत्ताधारीकडे ८ व विरोधीगटाकडे ९ असे ८९ या आकड्याला विशेष महत्त्व आले. परंतु याच आकड्यामुळे आता विकासकामांना मोठी खिळ बसली आहे.नवरगाव ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी विकास कामासाठी आला आहे. पदभार स्वीकारण्याला दोन महिन्याच्या वर कालावधी झाला आहे. मात्र कोणत्याही विकास कामांना सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत ७० ते ८० टक्के रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये काही सिमेंट रस्ते आहेत. गावकऱ्यांना चालताना व वाहन चालकांनाही वाहन सांभाळून चालवावे लागत आहे. काही रस्त्यांवर गतिरोधक बनविले. मात्र ते अरुंद व जास्त उंच असल्याने वाहन चालकांचाच जीव धोक्यात आला आहे. आझाद चौक ते रत्नापूर फाटा रस्त्यावर खड्डे पडले. त्यावर मागील पाच-सहा वर्षापासून ग्रामपंचायत कडून तात्पुरता मुरुम टाकल्या जातो. पुन्हा तो रस्ता वाहतुकीमुळे तसाच होतो. बऱ्याच ठिकाणच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डास नष्ट करण्यासाठी फवारणीचा प्रश्न आहे. मागील एक-दीड वर्षापूर्वी नवीन कोंडवाडा बांधण्यात आला. परंतु त्याचा उपयोग होत नाही आहे.ग्रामपंचायतीकडे विकास कामासाठी ७० लाखांच्या आसपास निधी पडला असल्याची चर्चा आहे. मात्र विकास कामाचे नियोजनाची गरज आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य असल्याने ८९ या आकड्याचे ग्रहण नवरगाव ग्रामपंचायत लागल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे. त्यामुळे विकास कामांना गती देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)