शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

विकास कामे ठप्प : नागरिकांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 02:11 IST

सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांची संख्या असून लोकसंख्या १५ हजारच्या आसपास आहे. मागील अडीच-तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक भाजपा गट, काँग्रेस गट व गोपाल चिलबुले गट अशा तीन गटामध्ये लढल्या गेली. भाजपा गटाचे नऊ उमेदवार, काँग्रेस गटाचे चार उमेदवार तर चिलबुले गटाचे चार उमेदवार निवडून आले. मात्र सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा गटातील एक सदस्य फुटला आणि चिलबुले गटाला मिळाला. काँग्रेस व चिलबुले गट एकत्र आले. त्यामुळे भाजपा गटाकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य झाले. सरपंच पद राखीव असल्याने आठ मधील सरपंच झाल्या. म्हणजे ८ व ९ असे ८९ तसेच सरपंच पदाची निवडणुकही ८-९-२०१५ ला झाली. सत्ताधारीकडे ८ व विरोधीगटाकडे ९ असे ८९ या आकड्याला विशेष महत्त्व आले. परंतु याच आकड्यामुळे आता विकासकामांना मोठी खिळ बसली आहे.नवरगाव ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी विकास कामासाठी आला आहे. पदभार स्वीकारण्याला दोन महिन्याच्या वर कालावधी झाला आहे. मात्र कोणत्याही विकास कामांना सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत ७० ते ८० टक्के रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये काही सिमेंट रस्ते आहेत. गावकऱ्यांना चालताना व वाहन चालकांनाही वाहन सांभाळून चालवावे लागत आहे. काही रस्त्यांवर गतिरोधक बनविले. मात्र ते अरुंद व जास्त उंच असल्याने वाहन चालकांचाच जीव धोक्यात आला आहे. आझाद चौक ते रत्नापूर फाटा रस्त्यावर खड्डे पडले. त्यावर मागील पाच-सहा वर्षापासून ग्रामपंचायत कडून तात्पुरता मुरुम टाकल्या जातो. पुन्हा तो रस्ता वाहतुकीमुळे तसाच होतो. बऱ्याच ठिकाणच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डास नष्ट करण्यासाठी फवारणीचा प्रश्न आहे. मागील एक-दीड वर्षापूर्वी नवीन कोंडवाडा बांधण्यात आला. परंतु त्याचा उपयोग होत नाही आहे.ग्रामपंचायतीकडे विकास कामासाठी ७० लाखांच्या आसपास निधी पडला असल्याची चर्चा आहे. मात्र विकास कामाचे नियोजनाची गरज आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य असल्याने ८९ या आकड्याचे ग्रहण नवरगाव ग्रामपंचायत लागल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे. त्यामुळे विकास कामांना गती देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)