शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामे ठप्प : नागरिकांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 02:11 IST

सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांची संख्या असून लोकसंख्या १५ हजारच्या आसपास आहे. मागील अडीच-तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक भाजपा गट, काँग्रेस गट व गोपाल चिलबुले गट अशा तीन गटामध्ये लढल्या गेली. भाजपा गटाचे नऊ उमेदवार, काँग्रेस गटाचे चार उमेदवार तर चिलबुले गटाचे चार उमेदवार निवडून आले. मात्र सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा गटातील एक सदस्य फुटला आणि चिलबुले गटाला मिळाला. काँग्रेस व चिलबुले गट एकत्र आले. त्यामुळे भाजपा गटाकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य झाले. सरपंच पद राखीव असल्याने आठ मधील सरपंच झाल्या. म्हणजे ८ व ९ असे ८९ तसेच सरपंच पदाची निवडणुकही ८-९-२०१५ ला झाली. सत्ताधारीकडे ८ व विरोधीगटाकडे ९ असे ८९ या आकड्याला विशेष महत्त्व आले. परंतु याच आकड्यामुळे आता विकासकामांना मोठी खिळ बसली आहे.नवरगाव ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी विकास कामासाठी आला आहे. पदभार स्वीकारण्याला दोन महिन्याच्या वर कालावधी झाला आहे. मात्र कोणत्याही विकास कामांना सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत ७० ते ८० टक्के रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये काही सिमेंट रस्ते आहेत. गावकऱ्यांना चालताना व वाहन चालकांनाही वाहन सांभाळून चालवावे लागत आहे. काही रस्त्यांवर गतिरोधक बनविले. मात्र ते अरुंद व जास्त उंच असल्याने वाहन चालकांचाच जीव धोक्यात आला आहे. आझाद चौक ते रत्नापूर फाटा रस्त्यावर खड्डे पडले. त्यावर मागील पाच-सहा वर्षापासून ग्रामपंचायत कडून तात्पुरता मुरुम टाकल्या जातो. पुन्हा तो रस्ता वाहतुकीमुळे तसाच होतो. बऱ्याच ठिकाणच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डास नष्ट करण्यासाठी फवारणीचा प्रश्न आहे. मागील एक-दीड वर्षापूर्वी नवीन कोंडवाडा बांधण्यात आला. परंतु त्याचा उपयोग होत नाही आहे.ग्रामपंचायतीकडे विकास कामासाठी ७० लाखांच्या आसपास निधी पडला असल्याची चर्चा आहे. मात्र विकास कामाचे नियोजनाची गरज आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य असल्याने ८९ या आकड्याचे ग्रहण नवरगाव ग्रामपंचायत लागल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे. त्यामुळे विकास कामांना गती देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)