शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

विकासकामांची बांधकामे निकृष्ट

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध

सास्ती : नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. काही कामे तर अर्धवट सोडून दिल्याचेही चित्र दिसून येत आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जात असल्याचे चित्र राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर येथील गाव तलावाच्या तसेच याच भागातील पेल्लोरा-किन्हीबोडी या रस्त्याच्या कामाकडे पाहिल्यावर दिसून येत आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत २० लाख ३९ हजार ६२ रुपयांच्या गावतलावाचे काम मंजूर करण्यात आले. मोठ्या थाटामाटात कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु तलावाचे काम अगदीच निकृष्ट दर्जाच्या केल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पारीला भोके पडून व भेगा जाऊन तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न तर भंगलेच. परंतु शासनाचा लाखो रुपयांचा निधीसुद्धा व्यर्थ गेला. याच परिसरातील पेल्लोरा ते किन्हबोडी या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे २० लाखांचे काम मंजूर आहे. मात्र काम अजूनही थंडबस्त्यात आहे. रस्त्याच्या कडेवर गिट्टी-माती टाकून ठेवण्यात आली आहे. परंतु काम पूर्ण झाले नाही. जे काम केले तेही निकृष्ट दर्जाचे आहे. (वार्ताहर)