शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विकासकामांची बांधकामे निकृष्ट

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध

सास्ती : नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. काही कामे तर अर्धवट सोडून दिल्याचेही चित्र दिसून येत आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जात असल्याचे चित्र राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर येथील गाव तलावाच्या तसेच याच भागातील पेल्लोरा-किन्हीबोडी या रस्त्याच्या कामाकडे पाहिल्यावर दिसून येत आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत २० लाख ३९ हजार ६२ रुपयांच्या गावतलावाचे काम मंजूर करण्यात आले. मोठ्या थाटामाटात कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु तलावाचे काम अगदीच निकृष्ट दर्जाच्या केल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पारीला भोके पडून व भेगा जाऊन तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न तर भंगलेच. परंतु शासनाचा लाखो रुपयांचा निधीसुद्धा व्यर्थ गेला. याच परिसरातील पेल्लोरा ते किन्हबोडी या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे २० लाखांचे काम मंजूर आहे. मात्र काम अजूनही थंडबस्त्यात आहे. रस्त्याच्या कडेवर गिट्टी-माती टाकून ठेवण्यात आली आहे. परंतु काम पूर्ण झाले नाही. जे काम केले तेही निकृष्ट दर्जाचे आहे. (वार्ताहर)