शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

विकासने घेतले होते कोरपन्यात व्यवसाय प्रशिक्षण

By admin | Updated: September 22, 2016 00:49 IST

जम्मू कश्मीरमधील उरी येथे रविवारी पहाटे भारतीय जवानांच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला.

मनोज गोरे/जयंत जेनेकर कोरपनाजम्मू कश्मीरमधील उरी येथे रविवारी पहाटे भारतीय जवानांच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश होता. यातील यवतमाळ जिल्ह्यातील मुरड (नेरड) येथील विकास जनार्दन कुडमेथे हा जवान जखमी झाला. त्याचा दिल्ली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कोरपन्यात एकच शोककळा पसरली.पुरड (नेरड) येथील मूळ निवासी असलेल्या विकासचे कोरपन्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. माध्यमिक शिक्षणानंतर घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने कोरपना येथील अमोल ढवस यांच्या वेल्डींग वर्कशॉप मध्ये त्याने रोजंदारीवर काम स्वीकारले. त्यानंतर २००८ ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरपना येथे वायरमन ट्रेडला प्रवेश घेऊन वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान सुट्टीच्या दिवसात त्याने वेल्डींग वर्कशॉपवरचे काम सुरू ठेवले. याचबरोबर अभ्यासक्रमात अत्यंत तल्लक्ष व हुशार असल्याने त्याने स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरू केली. रोज पहाटे ४ वाजता उठून नियमित व्यायाम, पोलीस व सैन्य भरतीसाठी आवश्यक ती पूर्ण तयारी त्यांनी यावेळी केल्याचे त्याचे जिवलग मित्र प्रदीप कोल्हे, अमोल आसेकर, गजानन बेलकुडे यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे गिरवतानाच त्याने सैन्य भरतीसाठी अर्ज केला. त्यात तो पात्र होऊन २००९ मध्ये सैन्यात दाखल झाला. यात त्यासोबत प्रकाश किन्नाके या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडमधील मित्राचा समावेश होता. दोघांचीही पहिली पोस्टींग आराम येथे झाली. त्यानंतर ते जम्मू कश्मीर बटालियनमध्ये दाखल झाले. या सैन्य भरतीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तत्कालिन प्राचार्य भालचंद्र रासेकर, आर.बी. तावाडे, वसतिगृह अधीक्षक लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून करिअर संबधीेची वाट दाखविली. शांत, सुस्वभावी व मनमिळावू स्वभाव असलेल्या विकासने बाहेर गावातून येऊन सुद्धा आपल्या सवंगड्याशी चांगली मैत्री जमवली होती. यात त्याच्या जिवलग मित्रांमध्ये भारत वरारकर, निलेश केराम, किशोर कन्नाके, निलेश क्षिरसागर, हरिदास वरारकर, निलेश वाढई, धनराज देवतळे, विक्की कुळसंगे, प्रा. संजय तेलतुबंडे आदींचा समावेश होता. शरिरयष्टीने धष्टपुष्ट व कणखर असलेल्या विकासची घेतलेल्या कामाबद्दल ओढही अतिशय प्रामाणिक होती. एका दामात तीन घन मारुन १० एमएमची न तुटणारी सळाख, तो एका घनाच्या दणक्यात तोडत असल्याचे अमोल ढवस यांनी सांगितले. तो शहीद झाल्याच्या बातमीनंतर अनेकांनी साश्रू नयनांनी वाट मोकळी करून दिली.