शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बारावीच्या निकालात ब्रह्मपुरीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील विकास सीताराम परतानी हा वाणिज्य शाखेचा (इंग्रजी माध्यम) विद्यार्थी ९५. ८३ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला. त्यापाठोपाठ वरोरा येथील दिशा ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेची मृणाल उमेश लाभे ही ९५. ६७ टक्के गुण घेत द्वितीय आली. तर नेवजाबाई हितकारिणी ज्यु. कॉलेजची सलोनी पिलारे ही ९१.५० टक्के घेऊन तिसरी आली आहे.   यंदाच्या निकालात चंद्रपूर तालुका  (९७. ८३ टक्के) अव्वल ठरला, तर सिंदेवाही तालुका (९२.५५ टक्के) पिछाडीवर गेला. नागपूर विभागातील निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार १४५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २७ हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण दोन हजार ९७६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. १० हजार ६२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १२ हजार १०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून बारावीच्या निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा विदर्भात पाचव्या क्रमांकावर होता. (तालुकानिहाय निकाल पान २ वर)

वाणिज्य शाखा       ९४. ६६ टक्केवाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.६६ आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाणिज्य शाखेचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला आहे.

कला शाखा ९३. ६७ टक्केकला शाखेतून एकूण १३ हजार १४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ९३.६७ आहे. कला शाखेसाठी १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढले. गतवर्षी कोरोनामुळे १६ टक्के परीक्षेला बसले नव्हते. गतवर्षी निकाल ५ टक्क्यांनी कमी होता.

एमसीव्हीसी     ९६.१७ टक्के एमसीव्हीसी (व्होकेशनल) अभ्यास शाखेतून एक हजार ४९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ९६.१७ इतकी आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडीजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते जिवती, गोंडपिपरी, कोरपना, सावली, मूल, नागभीड, पोंभुर्णा या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल