शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चंद्रपूरला बनविणार विकासाचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:50 IST

पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : इरई नदीवर साकारणार ६५ कोटींचा केबल स्टेड पूल

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात. आता साबरमतीच्या धर्तीवर इरई नदीच्या घाटाचा विकास आपण करणार आहोत. इरई नदीवर मुंबईतील सी-लिंगसारखा पूल पुढील दीड वर्षात तयार होणार आहे. पाचवेळा निवडून देणाऱ्या जिल्हावासीयांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. नागरिकांचे आशीर्वाद कार्य करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला सर्व क्षेत्रात विकासाचे मॉडेल बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.इरई नदीच्या काठावर हजारो लोकांच्या उपस्थितीत बुधवारी ना. मुनगंटीवार यांनी नव्या व जुन्या चंद्रपूरला जोडणाºया ६५ कोटी १९ लाख रुपयांच्या दाताळा पुलाचे भूमीपुजन केले. यावेळी ते बोलत होते. चौपदरी असणाऱ्या या पुलामुळे चंद्रपूरच्या वैभवात भर पडणार असून इरई नदीला कितीही मोठा पूर आला तरी जुन्या व नव्या शहराचा संपर्क तुटणार नाही, अशी उंची या पुलाला मिळत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नवीन चंद्रपूर विकसित होण्यासाठी गती येणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, वरोराचे आमदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, म्हाडाचे संचालक संजय भिमनवार, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, सभापती अनुराधा हजारे उपस्थित होते.यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आजच्या भूमिपूजनाने पूर्ण होत आहे, असे स्पष्ट केले. यासाठी म्हाडाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून त्यापैकी ६५.१९ कोटी रुपयामध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. तर उर्वरित निधीमध्ये इरई नदीच्या घाटाचा विकास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.बसस्थानकेही होणार सुसज्जचंद्रपूर येथील बसस्थानकाचे २६ जानेवारीला भूमिपूजन केले जाणार आहे. जिल्हयातील अन्य बसस्थानकांच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूरमधील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी २५७ कोटींची योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील शाळांना ३५८ खोल्या आगामी काळात बांधून देण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये शाळेतील खोल्यांचे बाधकाम पूर्ण झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव पुढे येईल, असे स्पष्ट केले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देखणी इमारत केवळ वास्तू म्हणून नव्हे तर रोजगाराची संधी देणारे नवीन केंद्र म्हणून ओळखले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटावाचंद्रपूर जिल्हयात विकास व्हावा, यासाठी सत्तेत नसताना प्रचंड संघर्ष केला आहे. आज जेव्हा सत्ता आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वाद पाठीशी असताना महाराष्ट्रातील सर्व आघाडयांवर विकसित जिल्हा म्हणून काम करण्याचा सपाटा गेल्या तीन वर्षात सुरु केला असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रापासून राज्यातील अन्य भागातील लोकांना हेवा वाटावा, अशा वेगळया पध्दतीचा विकास व त्यातून रोजगारांची संधी देण्यासाठी आपली धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.