शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

टीडीआर प्रणालीतून चंद्रपूर महानगराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदायिक विकासात आपले दायित्व द्यावे वाटेल, अशा व्यवहारिक टीडीआर (टॉन्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) प्रणालीचा विकास ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर स्मार्ट शहर करण्यासाठी नवा विकास आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदायिक विकासात आपले दायित्व द्यावे वाटेल, अशा व्यवहारिक टीडीआर (टॉन्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) प्रणालीचा विकास करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.चंद्रपूर येथे ‘क्रेडाई’ (कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशियशन आॅफ इंडिया) या विकासकांच्या संघटनेतर्फे चंद्रपूर शहर विकास आराखडा आणि हस्तांतरण विकास हक्क (डेव्हलपमेंट प्लॅन आॅफ चंद्रपूर सिटी अ‍ॅन्ड ट्रॉन्सफरेबल डेव्हलपमेन्ट राईट) या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, क्रेडाईचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, सचिव संतोष कोलेट्टीवार आदी उपस्थित होते.सध्या चंद्रपूर महानगर पालिका ‘ड’ वर्गात मोडते. पालिकेच्या उत्पनाच्या स्त्रोतांना मर्यादा आहे. त्यामुळे विकास कामे करताना अडचणी असतात. अशाच अडचणी या ठिकाणच्या गृहनिर्माण क्षेत्रातही आहे. २० वर्षा पूर्वीच्या विकास आराखड्याला बदलवण्याची वेळ आली आहे. नवीन सरकार आल्यानंतर विकास आराखडयात आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागांचे महत्व वाढले असून या ठिकाणी विकास करताना टीडीआर नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.चंद्रपूर शहरात १५६ आरक्षित जागा आहेत. या सर्वाना टीडीआर कायदा समजून सांगावा लागेल. मालकांचा महानगरपालिकेचा आणि या शहराचा यामध्ये कसा फायदा आहे, हे पटवून द्यावे लागेल. वाढलेला एफएसआय आणि बदलेले टीडीआर धोरण यामुळे नव्या विकासाच्या वाटा कशा पध्दतीने उपलब्ध झाल्यात, हे सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले.केवळ ८.६२ टक्के निवासी जागाकार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी विकास आराखडा व टीडीआर या संदर्भातील सादरीकरण केले. चंद्रपूर शहरामध्ये केवळ ८.६२ टक्के निवासी जागा शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध असणाºया जागांमध्ये आता उंच इमारतींशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.