शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

जंगलव्याप्त २६ गावांमध्ये विकास होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:54 IST

ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी क्षेत्रातील वन्यप्राण्यांमुळे त्रस्त गावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता. या परिसरातील अनेक गावांमध्ये वाघाने हल्ला केल्यामुळे गेल्या चार महिन्यांत पाच जणांचा बळी गेला. अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या परिसरात नरभक्षक वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या क्षेत्रातील आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून या संदर्भात निवेदन दिले असता वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या दालनात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार वन्यप्राण्यांपासून धोका असलेल्या ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावात लोकोपयोगी कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती ब्रह्मपुरीचे आ. वडेट्टीवार यांनी दिली.वन विभागाचे सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विधीमंडळाचे उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, विकास खारगे, अशोक रामटेके, दोडल हे उपस्थित होते. तर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक शेळके आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय वनसंरक्षक सिंग हे व्हिडीयो कॉन्फरसींगच्या माध्यमात चंद्रपूरवरून उपलब्ध होते.यावेळी धामनगाव, वायगाव, धुलेगाव, रामपुरी, नवेगाव, बेलगाव, मुरपार, गायडोंगरी, परसोडी, खिलारी, खंडाळा, गडमोशी, पवनपार, टेकरी तुकूम, सामदा खुर्द, रत्नापूर, भुज, पदमापूर, हळदा, बोळधा, वांद्रा, कोसंबी, किटाळी, सिंदेवाही रान या २६ गावांमध्ये जवळपास ५२०० ते ५५०० कुटुंब राहत आहेत.या सर्व कुटुंबाना एलपीजी गॅस वनविभागाच्या वतीने तातडीने देण्यात येतील. वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होण्याकरिता वनविभागाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत जंगलाला लागून असलेल्या शेताला जाळी असलेल्या तारेचे फेन्सिंग करण्यात येणार आहे.या २६ गावांमध्ये मुख्य रस्त्यावर आणि जंगलाच्या सीमेवर एलएएडी सोलर लाईट लावण्यात येणार आहे. तसेच या २६ गावांच्या जवळ असलेल्या जंगलाच्या सीमेवर सहा फुट उंचीचे आणि किमान दोन किमी लांब जाळी असलेल्या जवळपास ५० ते ६० किमी अंतराचे तारेचे चेनिंग फेसिंग करण्यात येणार आहे.या तारेच्या कंपाऊडला लागूनच जंगलाच्या आतील भागात घनदाट बांबुचे रोपवन करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यप्राणी गावात येणार नाही, तसेच शेतीचे नुकसानही करणार नाही.या सर्व कामाचे तातडीने सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश वन सचिव विकास खारगे यांनी मुख्य वनसंरक्षक शेळके यांना दिले आहे. लवकरच या कामांना निधीसह मंजुरी मिळणार असल्याने येत्या आॅक्टोबर महिन्यापासून सदर कामास सुरुवातही होणार आहे, अशी माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.