शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

जंगलव्याप्त २६ गावांमध्ये विकास होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:54 IST

ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी क्षेत्रातील वन्यप्राण्यांमुळे त्रस्त गावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता. या परिसरातील अनेक गावांमध्ये वाघाने हल्ला केल्यामुळे गेल्या चार महिन्यांत पाच जणांचा बळी गेला. अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या परिसरात नरभक्षक वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या क्षेत्रातील आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून या संदर्भात निवेदन दिले असता वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या दालनात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार वन्यप्राण्यांपासून धोका असलेल्या ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावात लोकोपयोगी कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती ब्रह्मपुरीचे आ. वडेट्टीवार यांनी दिली.वन विभागाचे सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विधीमंडळाचे उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, विकास खारगे, अशोक रामटेके, दोडल हे उपस्थित होते. तर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक शेळके आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय वनसंरक्षक सिंग हे व्हिडीयो कॉन्फरसींगच्या माध्यमात चंद्रपूरवरून उपलब्ध होते.यावेळी धामनगाव, वायगाव, धुलेगाव, रामपुरी, नवेगाव, बेलगाव, मुरपार, गायडोंगरी, परसोडी, खिलारी, खंडाळा, गडमोशी, पवनपार, टेकरी तुकूम, सामदा खुर्द, रत्नापूर, भुज, पदमापूर, हळदा, बोळधा, वांद्रा, कोसंबी, किटाळी, सिंदेवाही रान या २६ गावांमध्ये जवळपास ५२०० ते ५५०० कुटुंब राहत आहेत.या सर्व कुटुंबाना एलपीजी गॅस वनविभागाच्या वतीने तातडीने देण्यात येतील. वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होण्याकरिता वनविभागाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत जंगलाला लागून असलेल्या शेताला जाळी असलेल्या तारेचे फेन्सिंग करण्यात येणार आहे.या २६ गावांमध्ये मुख्य रस्त्यावर आणि जंगलाच्या सीमेवर एलएएडी सोलर लाईट लावण्यात येणार आहे. तसेच या २६ गावांच्या जवळ असलेल्या जंगलाच्या सीमेवर सहा फुट उंचीचे आणि किमान दोन किमी लांब जाळी असलेल्या जवळपास ५० ते ६० किमी अंतराचे तारेचे चेनिंग फेसिंग करण्यात येणार आहे.या तारेच्या कंपाऊडला लागूनच जंगलाच्या आतील भागात घनदाट बांबुचे रोपवन करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यप्राणी गावात येणार नाही, तसेच शेतीचे नुकसानही करणार नाही.या सर्व कामाचे तातडीने सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश वन सचिव विकास खारगे यांनी मुख्य वनसंरक्षक शेळके यांना दिले आहे. लवकरच या कामांना निधीसह मंजुरी मिळणार असल्याने येत्या आॅक्टोबर महिन्यापासून सदर कामास सुरुवातही होणार आहे, अशी माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.