शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान महाराष्ट्राचे अन् निधी तेलंगणकडून

By admin | Updated: September 7, 2016 00:51 IST

आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत

महाराष्ट्र शासनाला जाग येईना : तेलंगण शासनाचे वर्चस्व कायम जिवती : आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असून विविध राज्यातील व जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र शासनाने या देवस्थानाला ‘क’ दर्जाच तिर्थक्षेत्रही घोषित केले. मात्र असे असताना देखील तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम करून आपले वर्चस्व गाजवित असून मंदिर ताब्यात घेते की, काय अशी शंका वर्तवली जात आहे जिवती तालुक्यापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर शंकरलोधी हे गाव आहे. गावानजीक असलेल्या घनदाट जंगलात विस्तीर्ण गुंफा व सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा अंथाग डोह आहे. अशा घनदाट ठिकाणी असलेल्या देवस्थानात अदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी विविध कार्यक्रमही होतात. येथे येणाऱ्या भाविकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजगुडा ते शंकरलोधी हा कच्चा रस्ता तयार केला व मंदिराचे बांधकाम करून अर्धवट सोडून दिले होते. दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत जाणारी भाविकांची संख्या पाहता, आपली दादागिरी दाखवित तेलंगणा शासनाने महाराष्ट्र शासनाने अर्धवट सोडलेले मंदिराचे बांधकाम पूर्ण केले व मंदिरापासून १०० मिटर अंतरावर सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत हे देवस्थान असतानाही तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम केले, हे महाराष्ट्र सरकारला दिसले नाही काय, त्यांच्यावर कार्यवाही का केली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकार ही बाब खपवून का घेते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशीच दादागिरी चालवित तेलंगणा शासन या अदिवासीच्या देवस्थानाचा ताबा तर घेणार नाही ना, असे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)शासनाने लक्ष द्यावेजिवती तालुक्यात निर्सगरम्य माणिकगड किल्ला आहे. अदिवासीचे श्रध्दास्थान असलेली शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान, मराईपाटणची मराईदेवी, पुरातन विष्णू मंदिर आणि अमलनाला येथील विलोभनीय तलाव, अशी अनेक ठिकाणे भाविकांना व पर्यटकांना मोहीत करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाने या बाबीकडे लक्ष देवून साकारात्मक पाऊल उचलले तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या बरोबरीचे हे ठिकाण ठरू शकेल.आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान हे आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान मानले जाते. याच मंदिरालगत उंच टेकडीवर चार ते पाच फुटाची कोरलेली खोली असून या खोलीतच शिवलिंगाची पिंड आहे. या शिवलिंगाच्या पिंडाला कान पकडून दोन्ही हाताने उचल्यास आपल्यावरील संकटे दूर होत असल्याचा नागरिकांचा समज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली गावे गेल्या अनेक वषार्पासून सीमावादात अडकलेली आहे. या गावात महाराष्ट्र शासन विकास कामे गांभीर्याने घेतली नाही. याच बाबीचा फायदा घेत तेलंगणा शासन विकास कामे करण्यावर मोठे भर देत आहे.