शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

देवस्थान महाराष्ट्राचे अन् निधी तेलंगणकडून

By admin | Updated: September 7, 2016 00:51 IST

आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत

महाराष्ट्र शासनाला जाग येईना : तेलंगण शासनाचे वर्चस्व कायम जिवती : आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असून विविध राज्यातील व जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र शासनाने या देवस्थानाला ‘क’ दर्जाच तिर्थक्षेत्रही घोषित केले. मात्र असे असताना देखील तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम करून आपले वर्चस्व गाजवित असून मंदिर ताब्यात घेते की, काय अशी शंका वर्तवली जात आहे जिवती तालुक्यापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर शंकरलोधी हे गाव आहे. गावानजीक असलेल्या घनदाट जंगलात विस्तीर्ण गुंफा व सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा अंथाग डोह आहे. अशा घनदाट ठिकाणी असलेल्या देवस्थानात अदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी विविध कार्यक्रमही होतात. येथे येणाऱ्या भाविकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजगुडा ते शंकरलोधी हा कच्चा रस्ता तयार केला व मंदिराचे बांधकाम करून अर्धवट सोडून दिले होते. दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत जाणारी भाविकांची संख्या पाहता, आपली दादागिरी दाखवित तेलंगणा शासनाने महाराष्ट्र शासनाने अर्धवट सोडलेले मंदिराचे बांधकाम पूर्ण केले व मंदिरापासून १०० मिटर अंतरावर सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत हे देवस्थान असतानाही तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम केले, हे महाराष्ट्र सरकारला दिसले नाही काय, त्यांच्यावर कार्यवाही का केली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकार ही बाब खपवून का घेते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशीच दादागिरी चालवित तेलंगणा शासन या अदिवासीच्या देवस्थानाचा ताबा तर घेणार नाही ना, असे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)शासनाने लक्ष द्यावेजिवती तालुक्यात निर्सगरम्य माणिकगड किल्ला आहे. अदिवासीचे श्रध्दास्थान असलेली शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान, मराईपाटणची मराईदेवी, पुरातन विष्णू मंदिर आणि अमलनाला येथील विलोभनीय तलाव, अशी अनेक ठिकाणे भाविकांना व पर्यटकांना मोहीत करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाने या बाबीकडे लक्ष देवून साकारात्मक पाऊल उचलले तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या बरोबरीचे हे ठिकाण ठरू शकेल.आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान हे आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान मानले जाते. याच मंदिरालगत उंच टेकडीवर चार ते पाच फुटाची कोरलेली खोली असून या खोलीतच शिवलिंगाची पिंड आहे. या शिवलिंगाच्या पिंडाला कान पकडून दोन्ही हाताने उचल्यास आपल्यावरील संकटे दूर होत असल्याचा नागरिकांचा समज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली गावे गेल्या अनेक वषार्पासून सीमावादात अडकलेली आहे. या गावात महाराष्ट्र शासन विकास कामे गांभीर्याने घेतली नाही. याच बाबीचा फायदा घेत तेलंगणा शासन विकास कामे करण्यावर मोठे भर देत आहे.