शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

देवस्थान महाराष्ट्राचे अन् निधी तेलंगणकडून

By admin | Updated: September 7, 2016 00:51 IST

आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत

महाराष्ट्र शासनाला जाग येईना : तेलंगण शासनाचे वर्चस्व कायम जिवती : आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असून विविध राज्यातील व जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र शासनाने या देवस्थानाला ‘क’ दर्जाच तिर्थक्षेत्रही घोषित केले. मात्र असे असताना देखील तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम करून आपले वर्चस्व गाजवित असून मंदिर ताब्यात घेते की, काय अशी शंका वर्तवली जात आहे जिवती तालुक्यापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर शंकरलोधी हे गाव आहे. गावानजीक असलेल्या घनदाट जंगलात विस्तीर्ण गुंफा व सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा अंथाग डोह आहे. अशा घनदाट ठिकाणी असलेल्या देवस्थानात अदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी विविध कार्यक्रमही होतात. येथे येणाऱ्या भाविकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजगुडा ते शंकरलोधी हा कच्चा रस्ता तयार केला व मंदिराचे बांधकाम करून अर्धवट सोडून दिले होते. दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत जाणारी भाविकांची संख्या पाहता, आपली दादागिरी दाखवित तेलंगणा शासनाने महाराष्ट्र शासनाने अर्धवट सोडलेले मंदिराचे बांधकाम पूर्ण केले व मंदिरापासून १०० मिटर अंतरावर सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत हे देवस्थान असतानाही तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम केले, हे महाराष्ट्र सरकारला दिसले नाही काय, त्यांच्यावर कार्यवाही का केली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकार ही बाब खपवून का घेते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशीच दादागिरी चालवित तेलंगणा शासन या अदिवासीच्या देवस्थानाचा ताबा तर घेणार नाही ना, असे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)शासनाने लक्ष द्यावेजिवती तालुक्यात निर्सगरम्य माणिकगड किल्ला आहे. अदिवासीचे श्रध्दास्थान असलेली शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान, मराईपाटणची मराईदेवी, पुरातन विष्णू मंदिर आणि अमलनाला येथील विलोभनीय तलाव, अशी अनेक ठिकाणे भाविकांना व पर्यटकांना मोहीत करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाने या बाबीकडे लक्ष देवून साकारात्मक पाऊल उचलले तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या बरोबरीचे हे ठिकाण ठरू शकेल.आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान हे आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान मानले जाते. याच मंदिरालगत उंच टेकडीवर चार ते पाच फुटाची कोरलेली खोली असून या खोलीतच शिवलिंगाची पिंड आहे. या शिवलिंगाच्या पिंडाला कान पकडून दोन्ही हाताने उचल्यास आपल्यावरील संकटे दूर होत असल्याचा नागरिकांचा समज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली गावे गेल्या अनेक वषार्पासून सीमावादात अडकलेली आहे. या गावात महाराष्ट्र शासन विकास कामे गांभीर्याने घेतली नाही. याच बाबीचा फायदा घेत तेलंगणा शासन विकास कामे करण्यावर मोठे भर देत आहे.