शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

बल्लारपुरातील दरोडेखोर वरोरा पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.

वरोरा : येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी वरोरा शहरात दोन घरफोड्या केल्याची कबुली देत ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांनाही आज वरोरा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरोरा शहरातील बावणे लेआऊटमध्ये राहणारे मधुकर आसेकर हे २७ मे २०१४ रोजी आपल्या कुटुंबियांसह बाहेर गावी गेले असता, रात्री त्यांच्या घरात चोरी करून ५० हजार रुपयाचे सोने, चांदीचे दागिणे व ८० हजार रोख असा एक लाख ३० हजार रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१४ रोजी बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील सेंट अ‍ॅन्स कॉन्व्हेंट नजीक राहणारे रवींद्र जोगी यांच्या घरी कुणीही नसल्याचे साधून ३१ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिणे लंपात केले. अशा एकापाठोपाठ एक घरफोड्या करून चोरटे फरार होत असल्याने वरोरा पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे होते. दोन्ही चोरटे बल्लारपूर येथील असून गडचांदूर येथे भाड्याने खोली करून राहत होते. वरोरा शहरात चोरी करायची व गडचांदूरमध्ये राहायचे. त्यामुळे ते हाती लागत नव्हते. ते गडचांदूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खोलीवर धाड टाकली असता, अजय मधुकर काने (२०) व बजरंग बापूराव काने (३०) हे दोघेही खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वरोरा शहरातील दोन घरफोड्या केल्याची कबुली डीबी पथकास देत चोरीतील ६० हजार रुपयाचे दागिणे पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगळे, डीबी पथक प्रमुख उमाकांत गौरकार, नितीन जाधव, राकेश तुराणकर, प्रकाश पखान, अनिल बैढा, निलेश ठेंगे, निकेश मुळे यांनी केला. दोन्ही आरोपींकडून आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. (तालुका प्रतिनिधी)