शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

आई-वडिलांचे छत्र हरविल्याने तन्वी-गौरी झाल्या निराधार !

By admin | Updated: February 6, 2016 01:09 IST

तीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला.

नियतीचा क्रूर खेळ : पतीच्या निधनानंतर मुलींसाठी केला संघर्षराजू गेडाम मूलतीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला आईचे प्रेमसुद्धा हिसकावून घ्यायचे होते की काय? काळाने तिच्यावरही झडप घातल्याने दहा वर्षीय तन्वी व चार वर्षीय गौरी आईविना पोरक्या झाल्या आहेत. ६५ वर्षीय एकमेव आजी असल्याने संगोपनाबरोबरच जगण्याचा प्रश्नही त्या दोघींसमोर उभा ठाकला आहे.मूल येथील भारती प्रभाकर बोर्डावार यांचा विवाह चंद्रपूर येथील सुशिल केशव आयतवार यांच्याशी झाला. त्यांना तन्वी (१०) व गौरी (४) अशा दोन मुली झाल्यात. सर्व काही सुरळीत संसार सुरू असताना १२ एप्रिल २०१२ ला एका अपघातात सुुुशिलचा मृत्यू झाला. लहान मुलींचा आधार गेल्याने भारती हादरून गेली. आता पतीशिवाय या मुलींना वाढवायचे कसे, असा प्रश्न तिच्यापुढे उभा ठाकला. मात्र मुलीकडे बघून तिने जगण्यासाठी संघर्ष सुरू केला. मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलींना सांभाळत असताना मात्र भारतीला आजार जडला. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता तेथील डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने आजार बरा होण्याऐवजी वाढला. त्यानंतर नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचार केला. तेथे जवळचा सर्वच पैसा खर्च झाला. एवढे पैसे खर्च करूनही प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. तब्बल सहा महिने मृत्यूशी झुंज देत भारती जगण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिची प्रकृती इतकी गंभीर झाली की, तिच्या जगण्याची आशाच मावळली. काही दिवसातच तिने तन्वी आणि गौरी या दोघींसह जगाचा कायमचा निरोप घेतला. वडिलांचे अपघाती निधन झाले. आईचा आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे आता तन्वी व गौरी निराधार झाल्या. ६५ वर्षीय आजी बेबीबाई आयतवार या त्यांच्यासाठी आता आधार उरला आहे. पण पुढे जगायचे कसे? असा प्रश्न त्या दोघीसमोर उभा ठाकला आहे.