शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांचे छत्र हरविल्याने तन्वी-गौरी झाल्या निराधार !

By admin | Updated: February 6, 2016 01:09 IST

तीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला.

नियतीचा क्रूर खेळ : पतीच्या निधनानंतर मुलींसाठी केला संघर्षराजू गेडाम मूलतीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला आईचे प्रेमसुद्धा हिसकावून घ्यायचे होते की काय? काळाने तिच्यावरही झडप घातल्याने दहा वर्षीय तन्वी व चार वर्षीय गौरी आईविना पोरक्या झाल्या आहेत. ६५ वर्षीय एकमेव आजी असल्याने संगोपनाबरोबरच जगण्याचा प्रश्नही त्या दोघींसमोर उभा ठाकला आहे.मूल येथील भारती प्रभाकर बोर्डावार यांचा विवाह चंद्रपूर येथील सुशिल केशव आयतवार यांच्याशी झाला. त्यांना तन्वी (१०) व गौरी (४) अशा दोन मुली झाल्यात. सर्व काही सुरळीत संसार सुरू असताना १२ एप्रिल २०१२ ला एका अपघातात सुुुशिलचा मृत्यू झाला. लहान मुलींचा आधार गेल्याने भारती हादरून गेली. आता पतीशिवाय या मुलींना वाढवायचे कसे, असा प्रश्न तिच्यापुढे उभा ठाकला. मात्र मुलीकडे बघून तिने जगण्यासाठी संघर्ष सुरू केला. मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलींना सांभाळत असताना मात्र भारतीला आजार जडला. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता तेथील डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने आजार बरा होण्याऐवजी वाढला. त्यानंतर नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचार केला. तेथे जवळचा सर्वच पैसा खर्च झाला. एवढे पैसे खर्च करूनही प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. तब्बल सहा महिने मृत्यूशी झुंज देत भारती जगण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिची प्रकृती इतकी गंभीर झाली की, तिच्या जगण्याची आशाच मावळली. काही दिवसातच तिने तन्वी आणि गौरी या दोघींसह जगाचा कायमचा निरोप घेतला. वडिलांचे अपघाती निधन झाले. आईचा आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे आता तन्वी व गौरी निराधार झाल्या. ६५ वर्षीय आजी बेबीबाई आयतवार या त्यांच्यासाठी आता आधार उरला आहे. पण पुढे जगायचे कसे? असा प्रश्न त्या दोघीसमोर उभा ठाकला आहे.