शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निराधारांना तीन महिन्यांपासून अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ...

बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदांना देण्यात आले आहे.

शिष्टमंडळात शिवचंद द्विवेदी, स्वामी रायबाराम, गणेश चौधरी, किशोर मोहुर्ले, देवा वाटकर, श्रीनिवास सुंचुवार आदींचा समावेश होता.

शिष्टमंडळाने यावेळी रेशन कार्ड हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ज्यामुळे केवळ रेशन दुकानातून स्वस्त धान्य उपलब्ध होत नाही. तर इतर सर्व सरकारी योजना आणि वैद्यकीय सेवांमध्ये रेशन कार्ड मागितले जाते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून ज्यांचे रेशन कार्ड पूर्णपणे अप्रचलित झाले आहेत. त्यांना नवीन शिधापत्रिका द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन रेशन कार्ड तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाल योजना हा गरीब, वृद्ध आणि विधवा महिलांचा आर्थिक आधार आहे. या मासिक मदतीने ते त्यांचा खर्च भागवतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या योजनांचे लाभार्थी आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. अनेक लाभार्थी आजारी आहेत. त्यांना औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे; पण बँकांमध्ये फेऱ्या मारूनही अनुदान मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनुदान त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.