शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

निराधारांना तीन महिन्यांपासून अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ...

बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदांना देण्यात आले आहे.

शिष्टमंडळात शिवचंद द्विवेदी, स्वामी रायबाराम, गणेश चौधरी, किशोर मोहुर्ले, देवा वाटकर, श्रीनिवास सुंचुवार आदींचा समावेश होता.

शिष्टमंडळाने यावेळी रेशन कार्ड हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ज्यामुळे केवळ रेशन दुकानातून स्वस्त धान्य उपलब्ध होत नाही. तर इतर सर्व सरकारी योजना आणि वैद्यकीय सेवांमध्ये रेशन कार्ड मागितले जाते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून ज्यांचे रेशन कार्ड पूर्णपणे अप्रचलित झाले आहेत. त्यांना नवीन शिधापत्रिका द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन रेशन कार्ड तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाल योजना हा गरीब, वृद्ध आणि विधवा महिलांचा आर्थिक आधार आहे. या मासिक मदतीने ते त्यांचा खर्च भागवतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या योजनांचे लाभार्थी आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. अनेक लाभार्थी आजारी आहेत. त्यांना औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे; पण बँकांमध्ये फेऱ्या मारूनही अनुदान मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनुदान त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.