शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

By admin | Updated: July 18, 2016 01:51 IST

हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला.

आगीत घर जळाले : रामदीन यांनी मांडली 'लोकमत'समोर व्यथा वतन लोणे घोडपेठ हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला. राहण्यासाठी निवारा उभा केला. आवश्यक वस्तू घरात आणल्या. गरिबीचे असले तरी एक-एक दिवस समाधानाचे जात होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच दडले होते. दोन महिन्यांपूर्वी २२ मे रोजी भर दुपारी रणरणत्या उन्हात अचानक आग लागली. प्रचंड तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीचा जोर वाढतच गेला. काही कळायच्या आतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. रामदीन यादव, पत्नी मनोरमा व नातू अनिकेत कसेबसे जीव वाचवून घराबाहेर पडले. लोकांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. राहते घर, अन्नधान्य, चीजवस्तू, कागदपत्रे आगीत भस्मसात होताना उघड्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका क्षणात सारे काही संपले होते. मेहनतीने उभ्या केलेल्या ४० वर्षांंच्या संसाराची राखरांगोळी झाली. अंगावरचे कपडे तेवढे उरले. ताडाळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात (उमरी रीठ) राहणारे रामदीन यादव आणि त्यांचे कुटुंब या दु:खातून अजूनही सावरले नाही. आग विझवताना रामदीन यांची पाठ पोळली गेली. तो घाव अजूनही दुरूस्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. आगीने सर्वस्व हिरावल्यामुळे जवळ पैसाही नाही. परिणामी जगायचे कसे, या विवंचनेत रामदीन आणि त्यांचे कुटुंबीय एक-एक दिवस काढत आहेत. ताडाळी ग्रामपंचायतीने घटनेच्या दिवशी पाच हजारांची मदत केली. तसेच तहसिल कार्यालयाकडून ६ हजार ७५० रूपयांचा मदतीचा धनादेश मिळाला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच वाढत्या महागाईच्या काळात ही मदत खुपच तोकडी असून या मदतीतून स्वत:वर उपचार करावे, की घरखर्च भागवावा, या विवंचनेत रामदीन सापडले आहेत. त्यामुळे शासनाने उचित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, बीपीएल यादीत नाव असूनही घरासाठी जमीन नावावर नाही. त्यामुळे आतापर्यंत घरकूल योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याची खंतही रामदीन यांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.