शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

By admin | Updated: July 18, 2016 01:51 IST

हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला.

आगीत घर जळाले : रामदीन यांनी मांडली 'लोकमत'समोर व्यथा वतन लोणे घोडपेठ हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला. राहण्यासाठी निवारा उभा केला. आवश्यक वस्तू घरात आणल्या. गरिबीचे असले तरी एक-एक दिवस समाधानाचे जात होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच दडले होते. दोन महिन्यांपूर्वी २२ मे रोजी भर दुपारी रणरणत्या उन्हात अचानक आग लागली. प्रचंड तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीचा जोर वाढतच गेला. काही कळायच्या आतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. रामदीन यादव, पत्नी मनोरमा व नातू अनिकेत कसेबसे जीव वाचवून घराबाहेर पडले. लोकांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. राहते घर, अन्नधान्य, चीजवस्तू, कागदपत्रे आगीत भस्मसात होताना उघड्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका क्षणात सारे काही संपले होते. मेहनतीने उभ्या केलेल्या ४० वर्षांंच्या संसाराची राखरांगोळी झाली. अंगावरचे कपडे तेवढे उरले. ताडाळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात (उमरी रीठ) राहणारे रामदीन यादव आणि त्यांचे कुटुंब या दु:खातून अजूनही सावरले नाही. आग विझवताना रामदीन यांची पाठ पोळली गेली. तो घाव अजूनही दुरूस्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. आगीने सर्वस्व हिरावल्यामुळे जवळ पैसाही नाही. परिणामी जगायचे कसे, या विवंचनेत रामदीन आणि त्यांचे कुटुंबीय एक-एक दिवस काढत आहेत. ताडाळी ग्रामपंचायतीने घटनेच्या दिवशी पाच हजारांची मदत केली. तसेच तहसिल कार्यालयाकडून ६ हजार ७५० रूपयांचा मदतीचा धनादेश मिळाला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच वाढत्या महागाईच्या काळात ही मदत खुपच तोकडी असून या मदतीतून स्वत:वर उपचार करावे, की घरखर्च भागवावा, या विवंचनेत रामदीन सापडले आहेत. त्यामुळे शासनाने उचित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, बीपीएल यादीत नाव असूनही घरासाठी जमीन नावावर नाही. त्यामुळे आतापर्यंत घरकूल योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याची खंतही रामदीन यांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.