शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

पाणी असतानाही भिसीवासीयांचा संघर्ष

By admin | Updated: November 26, 2015 00:51 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे.

नागरिक मुबलक पाण्याच्या प्रतीक्षेत : तीन पाणी टाक्या केवळ शोभेच्या वास्तूभिसी : चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. १७ ग्रामपंचायत सदस्य, तीन पाण्याच्या टाकी, सभोवताल पाणी आहे, पण भिसीतील जनता मात्र तहानलेलीच असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे. आज भिसी येथे सहा वार्ड असून तीन पाण्याच्या टाकी उभारण्यात आल्या आहेत. डोंगर्ला, मसनखुटी, टागोरकाटा व धापला तलाव अशा ठिकाणावरुन पाणी पुरवठा होतो. वार्ड क्र. १, २, ३ व ४ ला पाणी पुरवठा करणारी नळ योजनेची पाईप लाईन माजी सरपंच स्व. भगवानजी रेवतकर यांच्या काळातील पंचविस वर्षे पुर्वीची आहे. मेनरोडला मुख्य पाईपलाईन असल्यामुळे आणि नेहमी पाईपामध्ये दोष निर्माण होत असल्याने खोदकाम करावे लागते. त्यातच पाईप लाईन जीर्ण झाल्याने पाणी विनाकारण विसर्ग होऊन नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर खोदकाम होत असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी गावातील राजकारणाचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. हा प्रश्न असला तरी चिंतनाचा विषय बनला आहे. २५ वर्र्षापूर्वी पाईपलाईन टाकणाऱ्या ठेकेदाराला दोष देण्यात अर्थ नाही. त्यांच्यामुळेच आजपर्यंत नागरिकांना पाणी मिळाले आणि मिळत आहे हे सत्य विसरता येत नाही. मात्र सध्या आजचा विचार व कृती महत्त्वाची असून ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येवून जनतेला मूबलक पाणी मिळवून द्यावे, अशी आर्त मागणी भिसीवासी नागरिकांची आहे. (वार्ताहर)