शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पंधरवडा उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:34 IST

पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ मार्चपासून उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पग्रस्त रुग्णालयात : समस्या सोडविण्याची मागणीचंद्रपूर : पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ मार्चपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने अजूनही दखल न घेतल्याने सदर उपोषणाला १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन हे उपोषण सुरु आहे. मात्र यामध्ये उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उसेगाव, शेनगाव, वढा, पाढरकवडा, घुग्घुस या गावच्या हद्दीतील सुपिक शेतजमीन गुप्ता एनर्जी कंपनीने अत्यल्प अशा मोबदल्यात विकत घेतल्या. त्याबदल्यात १०० प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नौकरी देण्यात आली. परंतु, जुलै २०१३ पासून सदर कंपनी बंद आहे. तेव्हापासून कंपनीने कामगारांचे शोषण सुरु केले आहे. प्रकल्पग्रस्तांना २६ दिवसांऐवजी २० दिवसांचा पगार देण्यात येत होता. ते वेतनसुद्धा वेळेवर देण्यात येत नव्हते. कंपनी बंद झाल्यापासून प्रकल्पग्रस्तांना माती खोदणे, नाल्या साफ करणे, गवत कापणे अशी कामे देण्यात येत होती. तरीसुद्धा सदर कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने मागील साडेतीन वर्षापासून देण्यात आली नाही. तरीसुद्धा प्रकल्पग्रस्त काम करीत होते. मात्र मागील सहा महिन्यापासून व्यवस्थापनाने वेतन दिले नाही. परिणामी प्रकल्पग्रस्तावर उपासमारीची वेळ आली आहे. नौकरी मिळेल या आशेन शेतकऱ्यांनी आपली जमीन कंपनीला दिली. मात्र सद्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना जमीनही नाही, आणी नौकरीही नाही. त्यामुळे स्वत:चे व आपल्या परिवाराचे पालणपोषण कसे करायचे हा प्रश्न प्रकल्पग्रस्ताना पडला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगारांनी पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवस रोजगार आणि वेळेवर वेतन या मागण्यांसाठी २२ मार्चपासून उपोषण सुरू केले. मात्र या उपोषणाला १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही प्रशासनानी दखल घेतली नाही. परिणामी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याना रुग्णालयात भरती केले आहे. (नगर प्रतिनिधी)प्रशासनाचे आश्वासन फोलमागील बैठकीत प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेतले. मात्र, महिना लोटूनही कंपनी व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविल्या नाही. प्रशासनाचेही आश्वासनही फोल ठरले.