शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

पंधरवडा उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:34 IST

पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ मार्चपासून उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पग्रस्त रुग्णालयात : समस्या सोडविण्याची मागणीचंद्रपूर : पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ मार्चपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने अजूनही दखल न घेतल्याने सदर उपोषणाला १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन हे उपोषण सुरु आहे. मात्र यामध्ये उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उसेगाव, शेनगाव, वढा, पाढरकवडा, घुग्घुस या गावच्या हद्दीतील सुपिक शेतजमीन गुप्ता एनर्जी कंपनीने अत्यल्प अशा मोबदल्यात विकत घेतल्या. त्याबदल्यात १०० प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नौकरी देण्यात आली. परंतु, जुलै २०१३ पासून सदर कंपनी बंद आहे. तेव्हापासून कंपनीने कामगारांचे शोषण सुरु केले आहे. प्रकल्पग्रस्तांना २६ दिवसांऐवजी २० दिवसांचा पगार देण्यात येत होता. ते वेतनसुद्धा वेळेवर देण्यात येत नव्हते. कंपनी बंद झाल्यापासून प्रकल्पग्रस्तांना माती खोदणे, नाल्या साफ करणे, गवत कापणे अशी कामे देण्यात येत होती. तरीसुद्धा सदर कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने मागील साडेतीन वर्षापासून देण्यात आली नाही. तरीसुद्धा प्रकल्पग्रस्त काम करीत होते. मात्र मागील सहा महिन्यापासून व्यवस्थापनाने वेतन दिले नाही. परिणामी प्रकल्पग्रस्तावर उपासमारीची वेळ आली आहे. नौकरी मिळेल या आशेन शेतकऱ्यांनी आपली जमीन कंपनीला दिली. मात्र सद्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना जमीनही नाही, आणी नौकरीही नाही. त्यामुळे स्वत:चे व आपल्या परिवाराचे पालणपोषण कसे करायचे हा प्रश्न प्रकल्पग्रस्ताना पडला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगारांनी पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवस रोजगार आणि वेळेवर वेतन या मागण्यांसाठी २२ मार्चपासून उपोषण सुरू केले. मात्र या उपोषणाला १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही प्रशासनानी दखल घेतली नाही. परिणामी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याना रुग्णालयात भरती केले आहे. (नगर प्रतिनिधी)प्रशासनाचे आश्वासन फोलमागील बैठकीत प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेतले. मात्र, महिना लोटूनही कंपनी व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविल्या नाही. प्रशासनाचेही आश्वासनही फोल ठरले.