शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पात्र असूनही वृद्ध महिला घरकुल योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:52 IST

सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : मुसळधार पावसामुळे घर कोसळण्याचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कपेंढरी (कोके) : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तुत प्रतिनीधीने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, त्यांचे मातीचे व कुळाचे घर दोन्ही बाजुने खचले आहे. भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. मात्र पर्याय नसल्याने त्या अजुनही आपल्या कुटुंबासह पडक्या घरातच राहतात. पावसाळ्यात घर पडले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना इजा झाल्यास कोण जबाबदार असे कुटुंबीयांनी सांगितले.बऱ्याच वर्षापासून आपण घरकुलाची मागणी करीत आहे. परंतु, कोणीच माझ्या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मला अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.- मायाबाई शेंडे, पीडित.