शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

: पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही फोटो प्रकाश काळे गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची ...

:

पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही

फोटो

प्रकाश काळे

गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवा शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील अनुदानित सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने एक एकरातील सोयाबीन पिकावरच नांगर फिरविल्याचा धक्कादायक प्रकार गोवरी येथे घडला. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे एक एकरातील बियाणे उगवलेच नाही. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची पेरणी करूनही उगवण झाली नाही. सोयाबीनची पेरणी करूनही सोयाबीनच्या बियाणाने शेतकऱ्याला दगा दिला. पावसामुळे सोयाबीन उगवले नसेल म्हणून शेतकऱ्याने सोयाबीन उगविण्याची प्रतीक्षा केली. मात्र बियाणे उगवण शक्तीचा कालावधी निघून गेला तरी सोयाबीन उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवून त्याच जागेवर दुसरे पीक घेण्याचा निर्णय घेतला.

बॉक्स

नुकसान भरपाई द्यावी

शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे बियाणे पेरणी करूनही ते उगवले नाही. राजुरा तालुक्यातही हजारो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

माझ्या एक एकर शेतात मी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. पेरणी करूनही सोयाबीन बियाणे बोगस निघाले. त्यामुळे नाईलाजाने शेतातील पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- नागेश्वर देविदास ठेंगणे

नुकसानग्रस्त शेतकरी, गोवरी.