शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

: पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही फोटो प्रकाश काळे गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची ...

:

पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही

फोटो

प्रकाश काळे

गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवा शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील अनुदानित सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने एक एकरातील सोयाबीन पिकावरच नांगर फिरविल्याचा धक्कादायक प्रकार गोवरी येथे घडला. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे एक एकरातील बियाणे उगवलेच नाही. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची पेरणी करूनही उगवण झाली नाही. सोयाबीनची पेरणी करूनही सोयाबीनच्या बियाणाने शेतकऱ्याला दगा दिला. पावसामुळे सोयाबीन उगवले नसेल म्हणून शेतकऱ्याने सोयाबीन उगविण्याची प्रतीक्षा केली. मात्र बियाणे उगवण शक्तीचा कालावधी निघून गेला तरी सोयाबीन उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवून त्याच जागेवर दुसरे पीक घेण्याचा निर्णय घेतला.

बॉक्स

नुकसान भरपाई द्यावी

शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे बियाणे पेरणी करूनही ते उगवले नाही. राजुरा तालुक्यातही हजारो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

माझ्या एक एकर शेतात मी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. पेरणी करूनही सोयाबीन बियाणे बोगस निघाले. त्यामुळे नाईलाजाने शेतातील पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- नागेश्वर देविदास ठेंगणे

नुकसानग्रस्त शेतकरी, गोवरी.