शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

: पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही फोटो प्रकाश काळे गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची ...

:

पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही

फोटो

प्रकाश काळे

गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवा शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील अनुदानित सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने एक एकरातील सोयाबीन पिकावरच नांगर फिरविल्याचा धक्कादायक प्रकार गोवरी येथे घडला. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे एक एकरातील बियाणे उगवलेच नाही. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची पेरणी करूनही उगवण झाली नाही. सोयाबीनची पेरणी करूनही सोयाबीनच्या बियाणाने शेतकऱ्याला दगा दिला. पावसामुळे सोयाबीन उगवले नसेल म्हणून शेतकऱ्याने सोयाबीन उगविण्याची प्रतीक्षा केली. मात्र बियाणे उगवण शक्तीचा कालावधी निघून गेला तरी सोयाबीन उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवून त्याच जागेवर दुसरे पीक घेण्याचा निर्णय घेतला.

बॉक्स

नुकसान भरपाई द्यावी

शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे बियाणे पेरणी करूनही ते उगवले नाही. राजुरा तालुक्यातही हजारो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

माझ्या एक एकर शेतात मी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. पेरणी करूनही सोयाबीन बियाणे बोगस निघाले. त्यामुळे नाईलाजाने शेतातील पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- नागेश्वर देविदास ठेंगणे

नुकसानग्रस्त शेतकरी, गोवरी.