शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:44 IST

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी समस्यांकडे वेधले लक्ष : जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीत शेतकरी व जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले. सत्ताबदल होऊनही शेतकरी संकटात आहे. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा हवेत विरली. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीचे दावे खोटे ठरत आहेत. जबरान जोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वयाच्या ६० वर्र्षांनंतरही शेतकरी शेतमजूर व असंघटीत कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेंशनचा कायदा केला नाही. त्यामुळे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. परंतु, कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. कर्जमाफीसाठी नको त्या जाचक अटी शेतकºयांवर लादण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास शेतकºयांचे कल्याण होईल. परंतु, या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो जबरानजोत धारकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले आहे. गैरआदिवासी जबरानजोत धारकांना तीन पिढ्यांची जाचक अट (७५ वर्ष) लावण्यात आली. ती त्वरित रद्द करून सर्वांना जमिनीचे पट्टे व सात- बारा देण्यात यावा, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे. शेतकºयांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, भूसंपादन कायदा २०१३ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करून बळजबरीने वसुल करणाºयांवर कायदेशिर कारवाई करावी, आदी आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान, राज्य महासचिव नामदेव गावंडे, डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे, बाळकृष्ण दुमाने, मनोहर आदे, सुधीर खेवले, रामदास कामडी, भोजराज मैन्द यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व मूल तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.