शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:44 IST

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी समस्यांकडे वेधले लक्ष : जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीत शेतकरी व जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले. सत्ताबदल होऊनही शेतकरी संकटात आहे. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा हवेत विरली. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीचे दावे खोटे ठरत आहेत. जबरान जोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वयाच्या ६० वर्र्षांनंतरही शेतकरी शेतमजूर व असंघटीत कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेंशनचा कायदा केला नाही. त्यामुळे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. परंतु, कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. कर्जमाफीसाठी नको त्या जाचक अटी शेतकºयांवर लादण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास शेतकºयांचे कल्याण होईल. परंतु, या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो जबरानजोत धारकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले आहे. गैरआदिवासी जबरानजोत धारकांना तीन पिढ्यांची जाचक अट (७५ वर्ष) लावण्यात आली. ती त्वरित रद्द करून सर्वांना जमिनीचे पट्टे व सात- बारा देण्यात यावा, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे. शेतकºयांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, भूसंपादन कायदा २०१३ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करून बळजबरीने वसुल करणाºयांवर कायदेशिर कारवाई करावी, आदी आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान, राज्य महासचिव नामदेव गावंडे, डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे, बाळकृष्ण दुमाने, मनोहर आदे, सुधीर खेवले, रामदास कामडी, भोजराज मैन्द यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व मूल तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.