शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:44 IST

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी समस्यांकडे वेधले लक्ष : जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीत शेतकरी व जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले. सत्ताबदल होऊनही शेतकरी संकटात आहे. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा हवेत विरली. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीचे दावे खोटे ठरत आहेत. जबरान जोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वयाच्या ६० वर्र्षांनंतरही शेतकरी शेतमजूर व असंघटीत कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेंशनचा कायदा केला नाही. त्यामुळे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. परंतु, कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. कर्जमाफीसाठी नको त्या जाचक अटी शेतकºयांवर लादण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास शेतकºयांचे कल्याण होईल. परंतु, या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो जबरानजोत धारकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले आहे. गैरआदिवासी जबरानजोत धारकांना तीन पिढ्यांची जाचक अट (७५ वर्ष) लावण्यात आली. ती त्वरित रद्द करून सर्वांना जमिनीचे पट्टे व सात- बारा देण्यात यावा, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे. शेतकºयांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, भूसंपादन कायदा २०१३ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करून बळजबरीने वसुल करणाºयांवर कायदेशिर कारवाई करावी, आदी आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान, राज्य महासचिव नामदेव गावंडे, डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे, बाळकृष्ण दुमाने, मनोहर आदे, सुधीर खेवले, रामदास कामडी, भोजराज मैन्द यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व मूल तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.