शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

शिधापत्रिका नसणारे धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने लाॅकडाऊन सुरू केला आहे. संकटात सापडलेले कुणीही उपाशी ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने लाॅकडाऊन सुरू केला आहे. संकटात सापडलेले कुणीही उपाशी राहणार नाही, अशी घोषणा शासनाने केली. दरम्यान, अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. त्यातच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचेही धान्य मोफत दिले जात आहे. मात्र ज्या गरीब कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही. अशा कुटुंबीयांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन मोफत धान्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून कोरोचा दहशत पसरली आहे. मात्र आजही काही नागरिकांकडे शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहेत.

शहरात हातमजुरी करणारे अनेक कुटुंब आहेत. मोलमजुरी केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही बऱ्याच कुटुंबांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केले तर काही कुटुंबांकडे कागदपत्रेच नाहीत. लॉकडाऊन झाल्याने अशा कुटुंबांचे सर्व मार्ग बंद झाले. सध्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातून काहींना गहू व तांदूळ देण्यात येत आहे. रोजगाराच बंद झाल्याने कुटुंबांचे हाल सुरू आहेत. शिधापत्रिका नसल्याने सामाजिक संस्था व दानदात्यांकडे आशावादी नजरेने बघावे लागत आहे. त्यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना धान्य पुरविण्याची मागणी शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनी केली आहे.