शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

जिल्ह्यातील अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

वनसडी : देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बाल्याअवस्थेतच संस्काराची जडणघडण होते. आपला पाल्य सुशिक्षित व संस्कारक्षम व्हावा, असे प्रत्येकच पालकाला वाटते. त्यासाठी ते आपल्या पाल्यांना शिक्षण देतात. ग्रामीण भागात अंगणवाडी हेच एकमेव माध्यम बाल्यावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी असते. जिल्ह्यात आज अनेक अशी गावे आहेत, त्या ठिकाणी अंगणवाड्यात स्वच्छतागृहेच नाहीत. त्यामुळे आपल्या नैसर्गिक गरजा उघड्यावरच पार पाडाव्या लागतात. अस्वच्छतेमुळे या निरागसांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कोवळ्या मनात स्वच्छतेविषयी बालमनापासूनच संस्कार रुजविण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या ६ दशकानंतरही अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. काही ठिकाणी अंगणवाड्याला स्वत:ची इमारतही नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा अंगणवाडी सेविकेच्याच घरी ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात अंगणवाड्या टिकण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होईल. मात्र अद्याप हा विचार प्रशासनाच्या मनाला अद्यापही शिवलेला नाही. त्याचमुळे अनेक अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित आहेत. प्रशासनाने अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)