शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्ह्यातील अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

वनसडी : देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बाल्याअवस्थेतच संस्काराची जडणघडण होते. आपला पाल्य सुशिक्षित व संस्कारक्षम व्हावा, असे प्रत्येकच पालकाला वाटते. त्यासाठी ते आपल्या पाल्यांना शिक्षण देतात. ग्रामीण भागात अंगणवाडी हेच एकमेव माध्यम बाल्यावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी असते. जिल्ह्यात आज अनेक अशी गावे आहेत, त्या ठिकाणी अंगणवाड्यात स्वच्छतागृहेच नाहीत. त्यामुळे आपल्या नैसर्गिक गरजा उघड्यावरच पार पाडाव्या लागतात. अस्वच्छतेमुळे या निरागसांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कोवळ्या मनात स्वच्छतेविषयी बालमनापासूनच संस्कार रुजविण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या ६ दशकानंतरही अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. काही ठिकाणी अंगणवाड्याला स्वत:ची इमारतही नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा अंगणवाडी सेविकेच्याच घरी ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात अंगणवाड्या टिकण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होईल. मात्र अद्याप हा विचार प्रशासनाच्या मनाला अद्यापही शिवलेला नाही. त्याचमुळे अनेक अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित आहेत. प्रशासनाने अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)