शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यातील अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

वनसडी : देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बाल्याअवस्थेतच संस्काराची जडणघडण होते. आपला पाल्य सुशिक्षित व संस्कारक्षम व्हावा, असे प्रत्येकच पालकाला वाटते. त्यासाठी ते आपल्या पाल्यांना शिक्षण देतात. ग्रामीण भागात अंगणवाडी हेच एकमेव माध्यम बाल्यावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी असते. जिल्ह्यात आज अनेक अशी गावे आहेत, त्या ठिकाणी अंगणवाड्यात स्वच्छतागृहेच नाहीत. त्यामुळे आपल्या नैसर्गिक गरजा उघड्यावरच पार पाडाव्या लागतात. अस्वच्छतेमुळे या निरागसांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कोवळ्या मनात स्वच्छतेविषयी बालमनापासूनच संस्कार रुजविण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या ६ दशकानंतरही अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. काही ठिकाणी अंगणवाड्याला स्वत:ची इमारतही नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा अंगणवाडी सेविकेच्याच घरी ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात अंगणवाड्या टिकण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होईल. मात्र अद्याप हा विचार प्रशासनाच्या मनाला अद्यापही शिवलेला नाही. त्याचमुळे अनेक अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित आहेत. प्रशासनाने अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)