शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:52 IST

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे.

ठळक मुद्देचिंतेची बाब : चंद्रपूर स्वच्छ होतेय; जलस्रोत केव्हा होणार?

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे. एकीकडे चंद्रपूर स्वच्छ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जलस्रोत कचऱ्याने बरबटले ठेवणे, ही बाब चंद्रपूरच्या सुदृढ आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारी ठरत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. जवळजवळ साडेचार लाखांचा आकडा लोकसंख्येने पार केला आहे. हा आलेख आणखी वाढतच जाणार आहे. असे असताना चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी सध्या एकमेव इरई धरण हेच जलस्रोत उपलब्ध आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला.त्यामुळे चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारे हे एकमेव जलस्रोतही सध्या अखेरची घटका मोजत आहे. या धरणात केवळ ३९ टक्के पाणी असल्याने यंदाचा उन्हाळा चंद्रपूरकरांच्या तोंडचे पाणी पळविणारा ठरणार आहे.सध्या मनपा प्रशासन चंद्रपूरकरांची तहान भागवू शकणाºया दुसऱ्या जलस्रोताच्या शोधात आहे. मात्र जे जलस्रोत प्राचिन काळापासून अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोंडराजाच्या राजवटीत चंद्रपुरात अनेक मोठमोठ्या विहिरी बांधल्या आहेत. ब्रिटीश सरकारनेही काही विहिरी बांधल्या. त्या आजही आपल्या पोटात बाराही महिने पाणी साठवून अस्तित्वात आहेत.महाकाली मंदिरामागे दोन विहिरी, नगिनाबाग येथील सवारी बंगाल्याजवळ एक विहीर, जटपुरा गेट हनुमान मंदिराजवळ एक विहीर, यासोबतच अंचलेश्वर मंदिर, जिल्हा कारागृह, भिवापूर येथील बंगाली कॅम्प या परिसरातही मोठमोठ्या प्राचीन विहिरी आहेत. तब्बल १५ ते १७ एमएलडी पाणी या विहिरींमधून चंद्रपूरकरांना मिळू शकते. मात्र या विहिरींकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या विहिरी पाण्यासोबत मनपाच्या उदासीनतेची घाणही आपल्या पोटात बाळगून आहे.सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान धडाक्यात राबविणे सुरू आहे. शहर स्वच्छतेसाठी एकावर एक पावले उचलली जात आहे. मनपाच्या या प्रयत्नांचे फलितही दृष्टीस पडत आहे, यात शंका नाही. मात्र शहर स्वच्छ करताना जलस्रोत तसेच उपेक्षित आणि घाणीने बरबटलेले ठेवणे योग्य नाही. मनपाच्या या कृत्यामुळे मनपाचेच स्वच्छता अभियान डागाळले जात आहे.शेकडो विहिरी बंदआगामी उन्हाळा चंद्रपूरकरांसाठी भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे. चंद्रपूर मनपाच्या हद्दीत सुमारे सव्वा पाचशे विहिरी आहेत. यातील केवळ १३२ विहिरीच सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यातीलही ८० हून अधिक विहिरींचे पाणी दूषित असल्याची माहिती आहे. शहरातील प्राचिन विहिरींसोबतच इतर विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छ केल्या तर पाण्याची पातळी वाढून त्याचा लाभ निश्चितच चंद्रपूरकरांना मिळणार आहे.सामाजिक संस्थांच्याही पुढाकाराची गरजचंद्रपुरातील या प्राचिन विहिरींना स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि जलस्रोत बघता मनपा प्रशासनाला हे प्राचिन जलस्रोत स्वच्छ आणि अबाधित ठेवावेच लागणार आहे. इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व त्यांच्या चमूने सलग शेकडो दिवस श्रमदान करून चंद्रपुरातील प्राचिन वास्तू व परकोट स्वच्छ केला. या प्राचिन जलस्रोतांच्याही स्वच्छतेसाठी शहरातील सामाजिक संस्थांनी असाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा आंदोलनसंजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे राजेश बेले यांनी या प्राचिन विहिरींची पाहणी केल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. शहराच्या पोटात असलेले हे प्राचिन जलस्रोत असे दूषित होत असल्याने त्यांनी ‘लोकमत’जवळ चिंता व्यक्त केली. मनपाने या विहिरींना स्वच्छ करून नवसंजीवनी द्यावी, अन्यथा संजीवनी संस्था या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा राजेश बेले यांनी दिला. यानंतरही मनपाने दखल घेतली नाही तर पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.