शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी दंगानियंत्रण पथक तैनात

By admin | Updated: March 3, 2017 00:51 IST

स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी

उत्पादन ठप्प : दुसऱ्यादिवशीही आंदोलन सुरुचमाजरी : स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी व मोबदल्याच्या मागणीसाठी पुकारलेले खाण बंद आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. रात्रभर महीला वर्ग कोळसा खदानीतच होत्या. बुधवारी सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाल्याने वेकोलिचे उत्पादन ठप्प पडून कोट्यवधींचा फटका वेकोलिला बसला आहे.वेकोलि व्यवस्थापनाने आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकासह पाचारण केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही वेकोलि व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्ताची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही व यावर कुठलाही तोडगा काढला नाही. दुसरीकडे जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: येऊन दखल घेत नाही व नोकरी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. वेकोलि व्यवस्थापनाने आम्हाला मंडप टाकण्यास मनाई केली आहे. काल रात्रभर आम्ही येथेच कोळशावर बसून राहिलो. आज पुन्हा भर उन्हात आंदोलन करीत आहोत, अशी माहिती प्रकल्पग्रस्त लिलेश ठवस व प्रहार संघटनेचे अमोल डुकरे यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. वेकोलि व्यवस्थापनाने जून २०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहीत करुन शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्या बदल्यात तीन महीन्यात प्रकल्पग्रस्ताना नोकरीवर रुजु करु, असे आश्वासन देऊन त्याना प्रशिक्षणसुध्दा दिले. मात्र गेल्या दोन वर्षापासून नोकरी दिली नाही. वेकोलिने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. वेकोलिच्या भूमी अधिग्रहनात ३५० प्रकल्पग्रस्त असून त्यातील १२० प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. या आंदोलनस्थळी दोन दिवसांपासून नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्रवीण सूर, भाजपाचे नेते उमेश बोडेकर, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, काँग्रेसचे विजय देवतळे, आसावरी देवतळे हे भेट देत असून अधिकारी व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करीत आहेत. यावेळी वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी, भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदिप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मिराबाई ढवस हे सहकुटुंब सहभागी झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने प्रहारचे संस्थापक व आमदार बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. आ. बच्चू कडू यांनी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना यांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी न देता प्रकल्प सुरू कसा केला, याविषयी जाब विचारला. यावर भद्रावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तात्काळ बैठक बोलावली आहे. (वार्ताहर)