शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी दंगानियंत्रण पथक तैनात

By admin | Updated: March 3, 2017 00:51 IST

स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी

उत्पादन ठप्प : दुसऱ्यादिवशीही आंदोलन सुरुचमाजरी : स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी व मोबदल्याच्या मागणीसाठी पुकारलेले खाण बंद आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. रात्रभर महीला वर्ग कोळसा खदानीतच होत्या. बुधवारी सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाल्याने वेकोलिचे उत्पादन ठप्प पडून कोट्यवधींचा फटका वेकोलिला बसला आहे.वेकोलि व्यवस्थापनाने आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकासह पाचारण केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही वेकोलि व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्ताची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही व यावर कुठलाही तोडगा काढला नाही. दुसरीकडे जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: येऊन दखल घेत नाही व नोकरी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. वेकोलि व्यवस्थापनाने आम्हाला मंडप टाकण्यास मनाई केली आहे. काल रात्रभर आम्ही येथेच कोळशावर बसून राहिलो. आज पुन्हा भर उन्हात आंदोलन करीत आहोत, अशी माहिती प्रकल्पग्रस्त लिलेश ठवस व प्रहार संघटनेचे अमोल डुकरे यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. वेकोलि व्यवस्थापनाने जून २०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहीत करुन शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्या बदल्यात तीन महीन्यात प्रकल्पग्रस्ताना नोकरीवर रुजु करु, असे आश्वासन देऊन त्याना प्रशिक्षणसुध्दा दिले. मात्र गेल्या दोन वर्षापासून नोकरी दिली नाही. वेकोलिने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. वेकोलिच्या भूमी अधिग्रहनात ३५० प्रकल्पग्रस्त असून त्यातील १२० प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. या आंदोलनस्थळी दोन दिवसांपासून नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्रवीण सूर, भाजपाचे नेते उमेश बोडेकर, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, काँग्रेसचे विजय देवतळे, आसावरी देवतळे हे भेट देत असून अधिकारी व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करीत आहेत. यावेळी वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी, भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदिप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मिराबाई ढवस हे सहकुटुंब सहभागी झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने प्रहारचे संस्थापक व आमदार बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. आ. बच्चू कडू यांनी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना यांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी न देता प्रकल्प सुरू कसा केला, याविषयी जाब विचारला. यावर भद्रावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तात्काळ बैठक बोलावली आहे. (वार्ताहर)